शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिल्लीत आणखी एक घोटाळा? आरोग्य विभागात 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप, आता CBI करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 16:59 IST

मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता.

दिल्लीतील आरोग्य विभागाने काही औषधांची खरेदी केली होती. मात्र, ही खरेदी करताना अनेक नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि भष्टाचार झाला, असा आरोप आहे. यातच आता, या प्रकरणी उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर आता दिल्लीमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनंतर, दिल्लीच्या आरोग्य विभागात ‘नको असलेल्या औषधी’च्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन देखील सामील आहेत, असा दावा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केला होता. सीबीआय चौकशीला मंजुरी - या प्रकरणी एसीबीने 2017 मध्ये चौकशी सुरू केली होती. एसीबीच्या शिफारशीनंतर उपराज्यपाल सक्सेना यांनी सीबीआय चौकशीला मंजुरी दिली. यानंतर, या चौकशी आदेशाबरोबरच आपचे उत्तरही आले आहे. "एलजींकडे यापूर्वीच एका अधिकाऱ्यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. दिल्ली सरकारने आधीच आरोग्य सचिव दीपक कुमार यांना पदावरून हटविण्याची शिफारस एलजींकडे केली आहे," असे आपने म्हटले आहे. आरोग्य सचिव दीपक कुमार यांनी फरिश्ते योजनाही थांबवली होती, असा आरोप आहे. दिल्ली सरकारने आधीच या अधिकाऱ्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तसेच, आरोग्य सचिव दीपक कुमार यांच्या विरोधात एलजी कारवाई करणार का, असा सवालही आपने केला आहे. 

कपिल मिश्रा यांचा आरोप -मिळालेल्या माहितीनुसार, "दिल्लीच्या आरोग्य विभागात "नको असलेल्या औषध" खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाला झाला आहे. तसेच, आरोग्य मंत्री सत्येन्द्र जैन देखील या घोटाळ्यात सामील होते, असा दावा कपिल मिश्रा यांनी केला होता. आता हे प्रकरण कुठपर्यंत जाते आणि चौकशीतून काय समोर येते हे बघावे लागेल.

सध्या व्हिजिलन्स विभागाच्या अहवालाला आधार माणून CBI चौकशीची शिफारस करत, दिल्लीचे एलजी विनय कुमार सक्सेना यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हे चिंताजनक आहे. लाखो रुग्णांना ही औषधी दिली जात आहे. एवढेच नाही, तर औषध खरेदीसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केल्यामुळेही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एका अहवालानुसार, व्हिजिलन्स विभागाचे म्हणणे आहे की,  सरकारी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्या आलेल्या 43 नमुन्यांपैकी 3 नमूने अयोग्य आहेत. तर 12 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तसेच, खाजगी प्रयोगशाळांना पाठवलेल्या इतर 43 नमुन्यांपैकी 5 नमुने अयोग्य आले आहेत. तर 38 नमुने योग्य आढळून आले आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालCBIगुन्हा अन्वेषण विभागCorruptionभ्रष्टाचारAam Admi partyआम आदमी पार्टी