शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'भारत रत्न' पुरस्कारांच्या घोषणेने होणार राजकीय लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 09:07 IST

दक्षिणेत सामर्थ्य वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत पाच मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या घोषणेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय लाभ मिळणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. ज्या राज्यांमध्ये भाजप प्रबळ नाही तिथे भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेमुळे मतदारांचे लक्ष या पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. 

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याने आंध्र प्रदेशमध्ये भाजपच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्या राज्यात भाजपला मतदारांचा फारसा पाठिंबा मिळालेला नाही. तसेच तेलंगणातही राजकीय फायदा होणार आहे. चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून मोदी सरकारने राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरींचे मन जिंकले आहे. ते चौधरी चरणसिंहांचे नातू आहेत. जाट आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा जयंत चौधरींना आहे. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिल्यामुळे तामिळनाडू व दक्षिण भारतातील अन्य राज्यांत भाजपला आणखी अधिक शिरकाव करता येईल, असा त्या पक्षाचा विचार असल्याचे कळते.

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह

शेतकरी कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य केले समर्पितमाजी पंतप्रधान चाैधरी चरणसिंह हे शेतकरी नेते म्हणूनच ओळखले जातात. शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले हाेते. त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात याेगदान हाेते. १९२९मध्ये त्यांना इंग्रजांनी तुरुंगातही टाकले हाेते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावलांवर पाऊल ठेवले. 

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव

राजकीय ‘विद्वान’ : आर्थिक उदारीकरणाचे जनक सलग आठ वेळा लाेकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आणि काॅंग्रेस पक्षात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यांना १७ भाषा अवगत हाेत्या. ६० वर्षांच्या वयातही त्यांनी संगणक प्राेग्रॅमिंगच्या २ भाषा शिकल्या हाेत्या. नरसिंह राव यांचे महाराष्ट्राशी घनिष्ट संबंध हाेते.

कृषितज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन

देशाच्या कृषिक्रांतीचे जनक; संशाेधनासाठी वाहिले आयुष्यस्वातंत्र्यानंतर देशामध्ये अन्नधान्याची टंचाई असतना डाॅ. स्वामिनाथन यांनी महत्त्वपूर्ण संशाेधन करुन कृषिक्रांती घडविली. त्यांनी जास्त उत्पादन देणारे गव्हाचे वाण विकसित केले हाेते. याशिवाय तांदुळवरही त्यांनी संशाेधन केले. बंगालच्या दुष्काळामुळे व्यथित झालेले स्वामीनाथन यांनी संपूर्ण आयुष्य कृषी संशाेधनासाठी वाहिले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBharat Ratnaभारतरत्नFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश