शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:45 IST

अंजू बुधवारी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला. सध्या तिला बीएसएफ कँपमध्ये ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तानी नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजूने बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. सध्या ती बीएसएफ कॅम्पमध्ये असून, तिचा पहिला फोटोही समोर आला आहे. अंजू, पती अरविंद आणि दोन मुलांसह राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे राहायची. सहा महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली आणि खैबर पख्तुनख्वा येथे राहणाऱ्या नसरुल्लाहसोबत लग्नही केले. भारतात परतलेल्या अंजूविरोधात काही कारवाई होईल का, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. 

2020 मध्ये अंजू आणि नसरुल्ला यांची फेसबुकवर ओळख झाली होती. नसरुल्ला पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील अप्पर दीर ​​जिल्ह्यातील रहिवासी आहे. फेसबुकवर त्यांची मैत्री वाढली आणि नंतर एकमेकांशी फोनवरही संपर्क सुरू झाला. सुमारे दोन वर्षे हा संवाद सुरू होता. अंजू आणि नसरुल्ला यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नसरुल्लाहने भारतात येण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर अंजूने पाकिस्तानात येण्यास होकार दिला.

अंजूने पासपोर्टही बनवला, पण अडचण व्हिसाची होती. अंजूने 21 जून रोजी पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता. अंजूचा पती अरविंदने सांगितले की, अंजू 20 जुलै रोजी अंजूने जयपूरला आई-वडिलांच्या घरी जात अशल्याचे सांगितले. अरविंदने अंजूला अनेकदा फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. 23 जुलै रोजी अंजूने तिच्या पतीला व्हॉट्सअॅपवर कॉल करून सांगितले की, ती तिच्या मित्रासोबत लाहोर, पाकिस्तानमध्ये आहे आणि तीन-चार दिवसांनी परत येईल. अंजू पाकिस्तानात गेल्याचे अरविंदला समजताच त्याला धक्का बसला. 

काही दिवसांनंतर अंजूने पाकिस्तानी नसरुल्लाहसोबत लग्न केले आणि पाकिस्तानातच राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता सहा महिने तिथे राहिल्यानंतर अंजू अचानक भारतात परतली आहे. तिच्या भारतात येण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

कोण आहे अंजू?मूळ राजस्थानची रहिवासी असलेली अंजू भिवडीतील एका ऑटोमोबाईल कंपनीत कामाला होती, तर तिचा पती अरविंद इंडो कंपनीत कामाला होता. अंजूचा पती अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब मूळ उत्तर प्रदेशातील बलिया येथील आहे, तर अंजूचे कुटुंब मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे राहते. अंजू आणि अरविंद यांचा विवाह 2007 साली झाला होता. अरविंदचा धर्म ख्रिश्चन आहे, तर अंजू हिंदू आहे. अंजूने लग्नानंतर धर्मही बदलला होता. त्या दोघांना दोन मुलेही आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRajasthanराजस्थान