शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:45 IST

अंजू बुधवारी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला. सध्या तिला बीएसएफ कँपमध्ये ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तानी नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजूने बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. सध्या ती बीएसएफ कॅम्पमध्ये असून, तिचा पहिला फोटोही समोर आला आहे. अंजू, पती अरविंद आणि दोन मुलांसह राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे राहायची. सहा महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली आणि खैबर पख्तुनख्वा येथे राहणाऱ्या नसरुल्लाहसोबत लग्नही केले. भारतात परतलेल्या अंजूविरोधात काही कारवाई होईल का, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. 

2020 मध्ये अंजू आणि नसरुल्ला यांची फेसबुकवर ओळख झाली होती. नसरुल्ला पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील अप्पर दीर ​​जिल्ह्यातील रहिवासी आहे. फेसबुकवर त्यांची मैत्री वाढली आणि नंतर एकमेकांशी फोनवरही संपर्क सुरू झाला. सुमारे दोन वर्षे हा संवाद सुरू होता. अंजू आणि नसरुल्ला यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नसरुल्लाहने भारतात येण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर अंजूने पाकिस्तानात येण्यास होकार दिला.

अंजूने पासपोर्टही बनवला, पण अडचण व्हिसाची होती. अंजूने 21 जून रोजी पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता. अंजूचा पती अरविंदने सांगितले की, अंजू 20 जुलै रोजी अंजूने जयपूरला आई-वडिलांच्या घरी जात अशल्याचे सांगितले. अरविंदने अंजूला अनेकदा फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. 23 जुलै रोजी अंजूने तिच्या पतीला व्हॉट्सअॅपवर कॉल करून सांगितले की, ती तिच्या मित्रासोबत लाहोर, पाकिस्तानमध्ये आहे आणि तीन-चार दिवसांनी परत येईल. अंजू पाकिस्तानात गेल्याचे अरविंदला समजताच त्याला धक्का बसला. 

काही दिवसांनंतर अंजूने पाकिस्तानी नसरुल्लाहसोबत लग्न केले आणि पाकिस्तानातच राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता सहा महिने तिथे राहिल्यानंतर अंजू अचानक भारतात परतली आहे. तिच्या भारतात येण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

कोण आहे अंजू?मूळ राजस्थानची रहिवासी असलेली अंजू भिवडीतील एका ऑटोमोबाईल कंपनीत कामाला होती, तर तिचा पती अरविंद इंडो कंपनीत कामाला होता. अंजूचा पती अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब मूळ उत्तर प्रदेशातील बलिया येथील आहे, तर अंजूचे कुटुंब मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे राहते. अंजू आणि अरविंद यांचा विवाह 2007 साली झाला होता. अरविंदचा धर्म ख्रिश्चन आहे, तर अंजू हिंदू आहे. अंजूने लग्नानंतर धर्मही बदलला होता. त्या दोघांना दोन मुलेही आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRajasthanराजस्थान