शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली, कारण अस्पष्ट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:45 IST

अंजू बुधवारी अटारी-वाघा सीमेवरुन भारतात प्रवेश केला. सध्या तिला बीएसएफ कँपमध्ये ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तानी नसरुल्लाहच्या प्रेमासाठी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजूने बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. सध्या ती बीएसएफ कॅम्पमध्ये असून, तिचा पहिला फोटोही समोर आला आहे. अंजू, पती अरविंद आणि दोन मुलांसह राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवडी येथे राहायची. सहा महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानला गेली आणि खैबर पख्तुनख्वा येथे राहणाऱ्या नसरुल्लाहसोबत लग्नही केले. भारतात परतलेल्या अंजूविरोधात काही कारवाई होईल का, याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. 

2020 मध्ये अंजू आणि नसरुल्ला यांची फेसबुकवर ओळख झाली होती. नसरुल्ला पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील अप्पर दीर ​​जिल्ह्यातील रहिवासी आहे. फेसबुकवर त्यांची मैत्री वाढली आणि नंतर एकमेकांशी फोनवरही संपर्क सुरू झाला. सुमारे दोन वर्षे हा संवाद सुरू होता. अंजू आणि नसरुल्ला यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नसरुल्लाहने भारतात येण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर अंजूने पाकिस्तानात येण्यास होकार दिला.

अंजूने पासपोर्टही बनवला, पण अडचण व्हिसाची होती. अंजूने 21 जून रोजी पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता. अंजूचा पती अरविंदने सांगितले की, अंजू 20 जुलै रोजी अंजूने जयपूरला आई-वडिलांच्या घरी जात अशल्याचे सांगितले. अरविंदने अंजूला अनेकदा फोन केला, मात्र तिचा फोन बंद होता. 23 जुलै रोजी अंजूने तिच्या पतीला व्हॉट्सअॅपवर कॉल करून सांगितले की, ती तिच्या मित्रासोबत लाहोर, पाकिस्तानमध्ये आहे आणि तीन-चार दिवसांनी परत येईल. अंजू पाकिस्तानात गेल्याचे अरविंदला समजताच त्याला धक्का बसला. 

काही दिवसांनंतर अंजूने पाकिस्तानी नसरुल्लाहसोबत लग्न केले आणि पाकिस्तानातच राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता सहा महिने तिथे राहिल्यानंतर अंजू अचानक भारतात परतली आहे. तिच्या भारतात येण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

कोण आहे अंजू?मूळ राजस्थानची रहिवासी असलेली अंजू भिवडीतील एका ऑटोमोबाईल कंपनीत कामाला होती, तर तिचा पती अरविंद इंडो कंपनीत कामाला होता. अंजूचा पती अरविंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब मूळ उत्तर प्रदेशातील बलिया येथील आहे, तर अंजूचे कुटुंब मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे राहते. अंजू आणि अरविंद यांचा विवाह 2007 साली झाला होता. अरविंदचा धर्म ख्रिश्चन आहे, तर अंजू हिंदू आहे. अंजूने लग्नानंतर धर्मही बदलला होता. त्या दोघांना दोन मुलेही आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टInternationalआंतरराष्ट्रीयSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाRajasthanराजस्थान