शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या रुपयाचा भाव! दुःखी झालेल्या 'त्या' शेतकऱ्याने तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर रस्त्यावर फेकून दिला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 10:28 IST

Farmer News : एका शेतकऱ्याने योग्य भाव न मिळाल्याने रागाच्या भरात तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर रस्त्यावर फेकून दिल्याचा घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने योग्य भाव न मिळाल्याने रागाच्या भरात तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर रस्त्यावर फेकून दिल्याचा घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. शेतमालाला चांगला भाव मिळाला नाही म्हणून निराश झालेल्या शेतकऱ्याने सर्व फ्लॉवर रस्त्यावर टाकून दिला. फेकण्यात आलेले फ्लॉवर उचलण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली आहे. 

सलीम असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याने आपल्या शेतात भरघोस असं फ्लॉवरचं उत्पादन घेतलं होतं. शेतात दिवस-रात्र राबून आणि हजारो रुपये खर्च करून त्याने फ्लॉवरची शेती केली होती. मात्र सलीम जेव्हा बाजारात विक्रीसाठी आला तेव्हा त्याला व्यापाऱ्यांनी फ्लॉवरसाठी फक्त एक रुपये किलो दर सांगितला. "माझी अर्धा एकर शेतजमीन आहे. ज्यामध्ये फ्लॉवरचं बियाणं, उत्पादन, खतं या सर्वांसाठी जवळपास आठ हजार रुपये खर्च आला. याचबरोबर हा माल येथे बाजारात आणण्यासाठी मला चार हजार खर्च आला" अशी माहिती सलीमने दिली आहे. 

"एक किलो दराने फ्लॉवर विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून दिला"

सलीमने "सध्या बाजारात फ्लॉवरची किंमत 10 ते 12 रुपये किलो आहे. त्यामुळेच मला किलोमागे किमान आठ रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. जेव्हा माझा शेतमाल एक रुपया किलोने विकत घेण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दाखवली तेव्हा मला हा शेतमाल फेकून देण्याशिवाय कोणता पर्याय हाती शिल्लक नव्हता. नाहीतर परत पैसे खर्च करुन तो मला घरी आणावा लागला असता" असं म्हटलं आहे. एक किलो दराने फ्लॉवर विकण्यापेक्षा तो रस्त्यावर फेकून दिला जेणेकरून गरजू लोक देखील त्याचा वापर करू शकतील असं देखील त्याने म्हटलं आहे. 

"फ्लॉवरला भाव न मिळाल्याने तोटा झाला"

टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, सलीमने पुढील पिकांसाठी आता पैसे नाहीत त्यामुळे कोणत्यातरी बँकेतून कर्ज घ्यावं लागणार असल्याचं म्हटलं आहे. फ्लॉवरला भाव न मिळाल्याने जो तोटा झाला आहे. माझ्या कुटुंबामध्ये आई, भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुलं असल्याचं म्हटलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजिल बालयान यांनी भाज्या या हमीभावाअंतर्गत येणाऱ्या पिकांमध्ये नाहीत त्यामुळे आम्ही सुद्धा काही करू शकत नाही, असं म्हटलं आहे. भाज्यांच्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी करुन जास्तीत जास्त नफा कमवण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न असतो असंही बालयान यांनी स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बाबो! 20, 40 नाही तर तब्बल 82 हजार रुपये किलो, देशात "या" ठिकाणी पिकतेय जगातील सर्वात महागडी भाजी 

बिहारच्या औरंगाबादमध्ये 82 हजार रुपये किलो विकणारी भाजी पिकवली जात आहे. या भाजीची शेती केली जात असून ही जगातील सर्वात महागडी भाजी असल्याचं सांगितलं जात आहे. भाजीची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. हॉप शूट्स (Hop Shoots) असं जगातील सर्वात महागड्या भाजीचं नाव आहे. एक किलो Hop Shoots ची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1000 युरो म्हणजेच 82 हजार रुपये आहे. ही भाजी सर्वसाधारणपणे दुकानात वा भाजी विक्रेत्यांकडे पाहायला मिळत नाही. औरंगाबादमधील शेतकरी अमरेश कुमार सिंह यांच्या शेतामध्येच ही भाजी पाहायला मिळते. नवीनगर प्रखंड येथील करमडीह गावात याची शेती केली जात आहे. अमरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार,  भारतीय भाजी अनुसंधान वाराणसी कृषी वैज्ञानिक डॉक्टर लाल यांच्या मार्गदर्शनाखाली या भाजीची ट्रायल शेती करण्यात आली आहे. 

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशvegetableभाज्या