शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 08:26 IST

पावसामुळे रुळांना तडे गेल्याने 100 पेक्षा जास्त ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

विशाखापट्टणम: बंगालच्या उपसागरातील मोसमी उलथापालथीमुळे आंध्र प्रदेशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत 33 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 12 जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. याशिवाय राज्यातील रेल्वे संपर्कावरही परिणाम झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने सांगितले की, नेल्लोरजवळ पडुगुपडू येथे रेल्वे रुळांना तडे गेल्याने 100 हून अधिक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून 29 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

अनेक महामार्गावरील वाहतूक बंदपावसामुळे राज्यातील नद्या, जलप्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचवेळी चित्तूर, कडप्पा, अनंतपूर आणि नेल्लोरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशात पेन्ना नदीला पूर आल्याने शेकडो वाहने आणि प्रवासी अडकले असून, महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतूक बंद आहे. रेल्वेशिवाय बससेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. नेल्लोर आरटीसी बसस्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडल्याचे वृत्त आहे.

शेकडो एकर पिके उद्धवस्तसरकारी आकडेवारीनुसार, पाऊस आणि पुरामुळे कडप्पामध्ये 20, अनंतपूरमध्ये 7, चित्तूरमध्ये 4 आणि एसपीएस नेल्लोरमध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला. नेल्लोर येथील सोमशिला जलाशयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचवेळी कडप्पा जिल्ह्यात 12 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो एकरांवर पसरलेली पिके उद्ध्वस्त झाली, गुरे वाहून गेली आणि गावातील अनेक घरे मोडकळीस आली.

एनडीआरएफची पथके तैनातआंध्र प्रदेशातील तिरुपती शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या जलाशयांना तडे गेल्याच्या बातम्यांनीही चिंता वाढवली आहे. मात्र, शहरात जोरदार पावसाची नोंद झाली नाही. एनडीआरएफच्या 10 व्या बटालियनने राजमपेट आणि तिरुपती येथे प्रत्येकी दोन पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफच्या तिसऱ्या बटालियनच्या दोन पथकांना विशाखापट्टणममध्ये तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

मोठी वित्तहानीआंध्र प्रदेशातील चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-16 हा आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि विजयवाडा आणि चेन्नई ग्रँड ट्रंक रेल्वेमार्ग, देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील आणि उत्तरेकडील भागांना जोडणारा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. . पुरामुळे रेल्वे ट्रॅक, रस्ते आणि हवाई वाहतुकीचे नुकसान झाले आहे. कडप्पा विमानतळ 25 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशfloodपूरRainपाऊस