शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 08:26 IST

पावसामुळे रुळांना तडे गेल्याने 100 पेक्षा जास्त ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

विशाखापट्टणम: बंगालच्या उपसागरातील मोसमी उलथापालथीमुळे आंध्र प्रदेशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत 33 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 12 जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. याशिवाय राज्यातील रेल्वे संपर्कावरही परिणाम झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने सांगितले की, नेल्लोरजवळ पडुगुपडू येथे रेल्वे रुळांना तडे गेल्याने 100 हून अधिक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून 29 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

अनेक महामार्गावरील वाहतूक बंदपावसामुळे राज्यातील नद्या, जलप्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचवेळी चित्तूर, कडप्पा, अनंतपूर आणि नेल्लोरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशात पेन्ना नदीला पूर आल्याने शेकडो वाहने आणि प्रवासी अडकले असून, महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतूक बंद आहे. रेल्वेशिवाय बससेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. नेल्लोर आरटीसी बसस्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडल्याचे वृत्त आहे.

शेकडो एकर पिके उद्धवस्तसरकारी आकडेवारीनुसार, पाऊस आणि पुरामुळे कडप्पामध्ये 20, अनंतपूरमध्ये 7, चित्तूरमध्ये 4 आणि एसपीएस नेल्लोरमध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला. नेल्लोर येथील सोमशिला जलाशयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचवेळी कडप्पा जिल्ह्यात 12 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो एकरांवर पसरलेली पिके उद्ध्वस्त झाली, गुरे वाहून गेली आणि गावातील अनेक घरे मोडकळीस आली.

एनडीआरएफची पथके तैनातआंध्र प्रदेशातील तिरुपती शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या जलाशयांना तडे गेल्याच्या बातम्यांनीही चिंता वाढवली आहे. मात्र, शहरात जोरदार पावसाची नोंद झाली नाही. एनडीआरएफच्या 10 व्या बटालियनने राजमपेट आणि तिरुपती येथे प्रत्येकी दोन पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफच्या तिसऱ्या बटालियनच्या दोन पथकांना विशाखापट्टणममध्ये तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.

मोठी वित्तहानीआंध्र प्रदेशातील चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-16 हा आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि विजयवाडा आणि चेन्नई ग्रँड ट्रंक रेल्वेमार्ग, देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील आणि उत्तरेकडील भागांना जोडणारा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. . पुरामुळे रेल्वे ट्रॅक, रस्ते आणि हवाई वाहतुकीचे नुकसान झाले आहे. कडप्पा विमानतळ 25 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशfloodपूरRainपाऊस