शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भयंकर! लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 09:47 IST

Andhra Pradesh Accident : भरधाव वेगात आलेली लॉरीने कारला धडक दिल्याने कारमधील लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये रविवारी एक भीषण अपघात झाला असून यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगात आलेली लॉरी (Lorry) ने कारला धडक दिल्याने कारमधील लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली गावात हा अपघात घडला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले सर्व लोक हे उरवाकोंडा येथील रहिवासी असून कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे लग्नासाठी गेले होते. 

लग्नाहून आपल्या गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उरवाकोंडा पोलीस करत आहेत. अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटली नसून पोलीस मृतांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. कर्नाटकातील बेल्लारी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उरवाकोंडा येथील एक कुटुंब आपल्या इनोव्हा कारने गेले होते. लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या लॉरीने त्यांच्या कारला भीषण टक्कर दिली. 

अपघात इतका भीषण होता की यात कारमधील 8 जण जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान आता मृत्यू झाला आहे. गाडीचा चेंदामेंदा झालाय. या घटनेमुळे उरवाकोंडा गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघात