शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सेंगोल निर्मात्यांनाही दिल्लीचं निमंत्रण?, १९४७ साली एवढ्या रुपयांत बनवला हा राजदंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 12:56 IST

'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ मे रोजी होणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत नव्या संसद भवनासंदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमात शाह यांनी सेंगोलबद्दल माहिती दिली होती. आता, या सेंगोलचे निर्माते एथिराजुलु आणि सुधाकर यांनाही संसद भवन उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. याप्रसंगी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. याबाबतची माहिती पीएम मोदींना मिळताच त्याची चौकशी करण्यात आली. मग ते देशासमोर ठेवायचे ठरले. त्यासाठी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिवस निवडण्यात आला. त्यानुसार, आता उद्घटनादिवशी तामिळनाडूतील हा सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येईल. त्यानंतर, संसदेतील सभापतींच्या खुर्चीजवळ हा सेंगोल लावला जाईल. हा तोच सेंगोल आहे, जो इंग्रजांनी १९४७ साली भारताकडे सत्ता देताना, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना दिला होता. 

१९४७ साली मद्रासचे सुवर्णकार वुम्मिडी बंगारु चेट्टी यांनी हस्तगीर कारागिरीद्वारे हा सेंगोल बनवला होता. १ महिन्यापेक्षा कमी कालावधीत हा सेंगोल बनवण्यात आला. त्यासाठी, बंगारू चेट्टी यांना १५,००० रुपये मिळाले होते, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. हा सेंगोल बनवण्यासाठी ९६ वर्षांचे वुम्मिदी एथिराजुलु (Vummidi Ethirajulu) आणि ८८ वर्षांचे वुम्मिदी सुधाकर (Vummidi Sudhakar) यांनीही परिश्रम घेतले होते. हा चांदीचा बनवण्यात आला असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आल्याचं एथिलाराजुलू यांनी सांगितलं. दरम्यान, या दोन कारागिरांनाही संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलावण्यात येणार असल्याचे समजते. तेव्हा १००० वर्षे जुनी परंपरा जपत पंडित नेहरुंना माऊंटबेटन यांच्याकडून हा सेंगोल देण्यात आला आणि सत्तेचं हस्तांरण पारंपरिक पद्धतीने झालं. 

अमित शहांनी सांगितला सेंगोलचा इतिहास

अमित शाह म्हणाले होत की, पंतप्रधान मोदींनी 'स्वातंत्र्याच्या अमृतकाल'मध्ये काही उद्दिष्टे ठेवली होती, त्यापैकी एक म्हणजे प्राचीन परंपरेचा आदर करणे आणि त्यामुळेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन केले जाईल.'याच्या मागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. याला तमिळमध्ये सेंगोल म्हणतात आणि याचा अर्थ संपत्तीने समृद्ध आणि ऐतिहासिक असा होतो. १४ ऑगस्ट १९४७ रोजी एक अनोखी घटना घडली. ७५ वर्षांनंतरही आज देशातील बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदTamilnaduतामिळनाडू