शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

सेंगोल निर्मात्यांनाही दिल्लीचं निमंत्रण?, १९४७ साली एवढ्या रुपयांत बनवला हा राजदंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 12:56 IST

'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील नव्या संसद भवनाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ मे रोजी होणार आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत नव्या संसद भवनासंदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमात शाह यांनी सेंगोलबद्दल माहिती दिली होती. आता, या सेंगोलचे निर्माते एथिराजुलु आणि सुधाकर यांनाही संसद भवन उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. याप्रसंगी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

'सेंगोलने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे सेंगोल सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले. याबाबतची माहिती पीएम मोदींना मिळताच त्याची चौकशी करण्यात आली. मग ते देशासमोर ठेवायचे ठरले. त्यासाठी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा दिवस निवडण्यात आला. त्यानुसार, आता उद्घटनादिवशी तामिळनाडूतील हा सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येईल. त्यानंतर, संसदेतील सभापतींच्या खुर्चीजवळ हा सेंगोल लावला जाईल. हा तोच सेंगोल आहे, जो इंग्रजांनी १९४७ साली भारताकडे सत्ता देताना, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना दिला होता. 

१९४७ साली मद्रासचे सुवर्णकार वुम्मिडी बंगारु चेट्टी यांनी हस्तगीर कारागिरीद्वारे हा सेंगोल बनवला होता. १ महिन्यापेक्षा कमी कालावधीत हा सेंगोल बनवण्यात आला. त्यासाठी, बंगारू चेट्टी यांना १५,००० रुपये मिळाले होते, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. हा सेंगोल बनवण्यासाठी ९६ वर्षांचे वुम्मिदी एथिराजुलु (Vummidi Ethirajulu) आणि ८८ वर्षांचे वुम्मिदी सुधाकर (Vummidi Sudhakar) यांनीही परिश्रम घेतले होते. हा चांदीचा बनवण्यात आला असून त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात आल्याचं एथिलाराजुलू यांनी सांगितलं. दरम्यान, या दोन कारागिरांनाही संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलावण्यात येणार असल्याचे समजते. तेव्हा १००० वर्षे जुनी परंपरा जपत पंडित नेहरुंना माऊंटबेटन यांच्याकडून हा सेंगोल देण्यात आला आणि सत्तेचं हस्तांरण पारंपरिक पद्धतीने झालं. 

अमित शहांनी सांगितला सेंगोलचा इतिहास

अमित शाह म्हणाले होत की, पंतप्रधान मोदींनी 'स्वातंत्र्याच्या अमृतकाल'मध्ये काही उद्दिष्टे ठेवली होती, त्यापैकी एक म्हणजे प्राचीन परंपरेचा आदर करणे आणि त्यामुळेच नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन केले जाईल.'याच्या मागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. याला तमिळमध्ये सेंगोल म्हणतात आणि याचा अर्थ संपत्तीने समृद्ध आणि ऐतिहासिक असा होतो. १४ ऑगस्ट १९४७ रोजी एक अनोखी घटना घडली. ७५ वर्षांनंतरही आज देशातील बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदTamilnaduतामिळनाडू