शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशाला लाजिरवाणी घटना! मणिपूर पोलिसांच्या ताब्यातून तरुणींना नेलेले, त्यांच्यासमोरच सगळे घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 14:31 IST

मणिपूर हिंसाचाराचा काळा चेहरा जगासमोर, सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही कारवाई करू, राज्य आणि केंद्र सरकारला तंबी दिली.

मणिपूर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जळत आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. माणसे मारली जात आहेत. हे पुरेसे नसताना याहूनही लाजिरवाणी घटना समोर येत आहे. सोशल मीडियावर मणिपूरमधील या हादरवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशवासियांची मान शरमेने खाली झुकली आहे. सारेकाही पोलिसांसमोरच घडले आहे, परंतू गुन्हा ४९ दिवसांनी तर पहिली अटक ७८ दिवसांनी झाली आहे. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूर सरकारही कारवाईच्या पवित्र्यात आले आहे. मणिपूर सरकार आणि प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला विरोधक लक्ष्य करत आहेत. पीएम मोदींनीही ही घटना 140 कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेत केंद्र आणि राज्याकडून केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असे न्यायालयाने कडक शब्दात सांगितले आहे. 

नेमके काय घडलेले....या लाजिरवाण्या घटनेची तक्रार १८ मे रोजी करण्यात आली होती. एफआयआरनुसार पिडीतांनी सांगितले की, ४ मे रोजी दुपारी ९०० ते १००० जणांच्या जमावाने थोबलमधील गावावर हल्ला केला. ते मैतेई समाजाचे होते. घरांना आगी लावण्यात आल्या. घरातील पैसे, दागिने यासह किंमती वस्तू लुटण्यात आल्या. 

हल्ला झाल्याचे समजताच तीन महिला त्यांचे वडील आणि भावासोबत जंगलाकडे पळाले. पोलिसांच्या टीमने त्यांना वाचविले आणि पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते. तेवढ्यात जमावाने पोलिसांना थांबविले आणि त्यांच्याकडून त्या महिला आणि त्यांच्या वडील-भावाला हिसकावून घेतले. पोलिस ठाणे तेथून दोन किमीवर होते. पोलिसांच्या समोरच जमावाने वडिलांची हत्या केली. यानंतर तिथेच महिलांना कपडे काढण्यास मजबूर करण्यात आले. एका महिलेचे वय २१ वर्षे, दुसरीचे ४२ आणि तिसरीचे ५२ वर्षे होते. 

त्या निर्वस्त्र महिलांना जमावाच्या पुढे चालण्यासाठी दबाव आणला गेला. यावेळी त्यांच्यासोबत छेडछाड करण्यात येत होती. २१ वर्षांच्या तरुणीवर जमावाने सामुहिक बलात्कार केला. तिच्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला ठार मारण्यात आले. हा प्रकार घडत असताना दोन महिलांना त्यांच्या काही ओळखीच्या लोकांनी तिथून बाजुला नेत जमावाच्या तावडीतून सोडविले. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारMolestationविनयभंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी