शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

बाबो! आधार कार्ड दाखवा आणि लग्नात जेवा; पाहुण्यांना पाहून वधू पक्षाने ठेवली भलतीच अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 13:07 IST

वधूपक्षाने दारात आलेल्या वऱ्हाड्यांना चक्क आधार कार्ड दाखविण्याची मागणी केली.

लग्न म्हटलं की भन्नाट किस्से हे आलेच. अमरोहा जिल्ह्यात एक अजब-गजब घटना समोर आली आहे. लग्नासाठी आलेले पाहुणेमंडळी पाहून कुटुंबीयांच्या नाकीनऊ आले. यानंतर लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाने अनोखी शक्कल लढवली. वधू पक्षाने दारात आलेल्या वऱ्हाड्यांना चक्क आधार कार्ड दाखविण्याची मागणी केली. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनाच फक्त लग्नमंडपात एन्ट्री देण्यात आली आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं, अशा लोकांना परत पाठवण्यात आल्याची विचित्र घटना घडली आहे. 

लग्नासाठी आलेली मंडळी यामुळे चांगलीच संतापली. त्यांनी या घटनेचा एक व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केला आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हसनपूर भागातील नवरीकडे वर पक्ष पोहोचला होता. वधू पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, जितकी पाहुण्यांची संख्या होती, त्याहून खूप जास्त लोकं लग्नाला आले होते. 

वधू पक्षाने जेव्हा मोठ्या संख्येने आलेले लोक पाहिले तर त्यांना मोठा धक्काच बसला. वर पक्षाने जितके संख्या सांगितली होती, त्यानुसार जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र पाहुण्यांची इतकी मोठी संख्या पाहून वधू पक्षाचे लोक घाबरले. त्यानंतर आधार कार्डाच्या आधारावर लग्न मंडळपात एन्ट्री देणार असल्याचं ठरवण्यात आलं. 

ज्या लोकांकडे आधार कार्ड होतं, केवळ त्यांनाच फक्त लग्नमंडपात एन्ट्री देण्यात आली. त्या दिवशी गावात दोन लग्न होती. जेव्हा एका लग्नात जेवण सुरू झालं तर दुसऱ्या लग्नात आलेले लोक देखील पहिल्या लग्नात जेवणासाठी धावले अशी माहिती नंतर समोर आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न