शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

अमृतसर रेल्वे अपघातास लोकच जबाबदार, रेल्वे प्रशासनाला 'क्लीट चीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:13 IST

रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी उपस्थितांना भरधाव ट्रेनने उडवल्याची भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता, याप्रकरणी तपास करणाऱ्या रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्तांचा अहवाल आला आहे. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. 

रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. तर, या अपघात दुर्घटनेला पू्र्णपणे रेल्वे ट्रॅकवर उपस्थित असणारे लोकच जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. पंजाबमध्ये अमृतसरच्या धोबी घाट परिसरात दसऱ्यादिवशी रावणाचे दहन करण्यासाठी अनेक लोक एकत्र जमले होते. त्यावेळी, हा रावणदहन सोहळा पाहण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळही लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या दरम्यान तेथून जाणाऱ्या डीएमयू रेल्वेच्या तावडीत हे लोक सापडले. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्ताने याबाबतची कारणे सांगितली आहेत. त्यामध्ये रेल्वे प्रशासन आणि गाडीच्या ड्रायव्हरला क्लीन चीट देण्यात आली आहे. तर, अपघातात रेल्वे ट्रॅकवरील उपस्थितांनाच दोषी ठरविण्यात आले आहे. कारण, लोकांचा निष्काळजीपणाच त्यांच्या मृत्युचे कारण ठरल्याचे सीसीआरएसचे म्हणणे आहे. तसेच यापुढे कुठल्याही रेल्वे क्रॉसिंग लाईनजवळ जत्रा, कार्यक्रम, आंदोलन किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम घ्यावयाचा असल्यास सर्वप्रथम स्थानिक रेल्वे प्रशासनाला कळविण्यात यावे. त्यानुसार संबंधित अधिकारी रेल्वेच्या ये-जा वेळांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करतील, असेही या अहवालात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाDeathमृत्यूrailwayरेल्वे