शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अमृतसर रेल्वे अपघातास लोकच जबाबदार, रेल्वे प्रशासनाला 'क्लीट चीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:13 IST

रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी उपस्थितांना भरधाव ट्रेनने उडवल्याची भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता, याप्रकरणी तपास करणाऱ्या रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्तांचा अहवाल आला आहे. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. 

रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. तर, या अपघात दुर्घटनेला पू्र्णपणे रेल्वे ट्रॅकवर उपस्थित असणारे लोकच जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. पंजाबमध्ये अमृतसरच्या धोबी घाट परिसरात दसऱ्यादिवशी रावणाचे दहन करण्यासाठी अनेक लोक एकत्र जमले होते. त्यावेळी, हा रावणदहन सोहळा पाहण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळही लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या दरम्यान तेथून जाणाऱ्या डीएमयू रेल्वेच्या तावडीत हे लोक सापडले. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्ताने याबाबतची कारणे सांगितली आहेत. त्यामध्ये रेल्वे प्रशासन आणि गाडीच्या ड्रायव्हरला क्लीन चीट देण्यात आली आहे. तर, अपघातात रेल्वे ट्रॅकवरील उपस्थितांनाच दोषी ठरविण्यात आले आहे. कारण, लोकांचा निष्काळजीपणाच त्यांच्या मृत्युचे कारण ठरल्याचे सीसीआरएसचे म्हणणे आहे. तसेच यापुढे कुठल्याही रेल्वे क्रॉसिंग लाईनजवळ जत्रा, कार्यक्रम, आंदोलन किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम घ्यावयाचा असल्यास सर्वप्रथम स्थानिक रेल्वे प्रशासनाला कळविण्यात यावे. त्यानुसार संबंधित अधिकारी रेल्वेच्या ये-जा वेळांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करतील, असेही या अहवालात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाDeathमृत्यूrailwayरेल्वे