शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसर रेल्वे अपघातास लोकच जबाबदार, रेल्वे प्रशासनाला 'क्लीट चीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:13 IST

रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी उपस्थितांना भरधाव ट्रेनने उडवल्याची भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. आता, याप्रकरणी तपास करणाऱ्या रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्तांचा अहवाल आला आहे. त्यामध्ये रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. 

रेल्वे प्रशासनाच्या तपास समितीने (सीसीआरएस) दिलेल्या अहवालात रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आली आहे. तर, या अपघात दुर्घटनेला पू्र्णपणे रेल्वे ट्रॅकवर उपस्थित असणारे लोकच जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. पंजाबमध्ये अमृतसरच्या धोबी घाट परिसरात दसऱ्यादिवशी रावणाचे दहन करण्यासाठी अनेक लोक एकत्र जमले होते. त्यावेळी, हा रावणदहन सोहळा पाहण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळही लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या दरम्यान तेथून जाणाऱ्या डीएमयू रेल्वेच्या तावडीत हे लोक सापडले. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्ताने याबाबतची कारणे सांगितली आहेत. त्यामध्ये रेल्वे प्रशासन आणि गाडीच्या ड्रायव्हरला क्लीन चीट देण्यात आली आहे. तर, अपघातात रेल्वे ट्रॅकवरील उपस्थितांनाच दोषी ठरविण्यात आले आहे. कारण, लोकांचा निष्काळजीपणाच त्यांच्या मृत्युचे कारण ठरल्याचे सीसीआरएसचे म्हणणे आहे. तसेच यापुढे कुठल्याही रेल्वे क्रॉसिंग लाईनजवळ जत्रा, कार्यक्रम, आंदोलन किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम घ्यावयाचा असल्यास सर्वप्रथम स्थानिक रेल्वे प्रशासनाला कळविण्यात यावे. त्यानुसार संबंधित अधिकारी रेल्वेच्या ये-जा वेळांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करतील, असेही या अहवालात म्हटले आहे. 

 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाDeathमृत्यूrailwayरेल्वे