शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

2019 लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहांचा मास्टर प्लान

By admin | Updated: September 8, 2016 08:48 IST

अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला होता अशा 200 जागांपैकी 115 जागांची यादी तयार केली आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुढील लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी आत्तापासूनच सुरु केली आहे. अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला होता अशा 200 जागांपैकी 115 जागांची यादी तयार केली आहे. या 115 जागांवर विजय मिळवणे शक्य असून त्यादृष्टीने तयारीला लागण्याचे आदेशही अमित शहांनी दिले आहेत. 282 जागांसोबत सत्ता काबीज केल्यानंतर मे 2014 मध्ये भाजपाने केंद्रात आपलं सरकार स्थापन केलं होतं. 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीतही बहुमत मिळवण्यासाठी भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
 
अमित शहा यांनी एक महिना अगोदरच या मोहिमेला सुरुवात केली आहे. ऑगस्टमध्ये अमित शहा यांनी ओडिशा, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्ये, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडूच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी भाजपाचा पराभव झालेल्या 115 जागांवर चर्चा करण्यात आली. पराभव झालेल्या मतदारसंघातील जागांवर विजय कसा मिळवता येईल याची रणनीती यावेळी ठरवण्यात आली. पक्षातर्फे या राज्यांमध्ये कोअर कमिटीची स्थापनादेखील करण्यात आली आहे, ज्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अॅक्शन प्लान सादर करायचा आहे. 
 
राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड भाजपाचे गड आहेत. याठिकाणी मिळणारी मतं नक्की असून ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सोबतच राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांनी 2014 मध्ये केलेली कामगिरी निवडणुकीत खालावली तर या 115 जागांच्या माध्यमातून त्यांची भरपाई करता येईल. भाजपाला पुढील निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेत यायचं असेल तर इतर राज्यांमध्येही यश मिळवणं तितकच महत्वाचं ठरणार आहे.
 
राज्यातील प्रमुख नेत्यांवर कोअर कमिटीच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ओडिशामध्ये अरुण सिंग, तामिळनाडूमध्ये मुरलीधर राव, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशमध्ये सिद्धार्थ नाथ सिंग आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये हेमंत बिसवा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे भाजपाच्या आशा उंचावल्या आहेत. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकीकडे पक्ष 2014 मध्ये कामगिरी केलेल्या राज्यांवर लक्ष ठेवणार आहे तर दुसरीकडे भाजपाध्यक्ष इतर राज्यांमध्ये पक्ष मजबूत करण्याची रणनीती आखणार आहेत.