शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

बिहारमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांची सभा रद्द; रामनवमीदिवशी झालेल्या हिंसाचारामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 13:03 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २ एप्रिल रोजी बिहार येथील सासाराम येथे होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २ एप्रिल रोजी बिहार येथील सासाराम येथे होणारी सभा पुढे ढकलण्यात आली आहे. सासाराममध्ये शुक्रवारी झालेल्या गोंधळानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते संजय मयुख यांनी शनिवारी ही माहिती दिली. मात्र, अमित शहा यांचा पटना आणि नवादाचा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री शनिवारी संध्याकाळी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. अमित शाह सम्राट अशोकाच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहून सासाराम येथील जाहीर सभेला संबोधित करणार होते.

तीन वर्षं निवडणूक लढवण्यास अपात्र ठरलेले 'राहुल गांधी' वेगळे; जाणून घ्या काय आहे प्रकरण

भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि आमदार संजय मयुख यांनी आज माहिती दिली. शुक्रवारी सासाराममधील गोंधळामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, २ एप्रिल रोजी नवाडा येथे त्यांची सभा होणार आहे. पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार शाह शनिवारी संध्याकाळी पटना येथे पोहोचणार आहेत.

गोंधळानंतर सासाराममध्ये तणाव

शुक्रवारी सासाराम येथे दोन गटात हाणामारी झाली. यानंतर जोरदार दगडफेक आणि जाळपोळ झाली. या गोंधळात अनेकजण जखमी झाले. यानंतर परिसरात इंटरनेट बंद करण्यात आले आणि कलम १४४ लागू करण्यात आले. सासाराममधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आली आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपद्रव पसरवणाऱ्या १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

सासाराम येथे सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांची सभा महत्त्वाची मानली जात होती. रेल्वे मैदानावरही मोठी जाहीर सभा होणार होती. त्यासाठी प्रदेश भाजपच्या नेत्यांनी पूर्ण तयारी केली होती. मात्र, आता शहा यांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी सासाराममध्ये झालेल्या गोंधळावरून भाजपने नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्ह यांनी टीका केली. 'सत्ताधारी पक्षांना अमित शहा यांची सासाराम भेट पचनी पडली नाही. शहा ज्या, ज्या वेळी बिहार दौऱ्यावर येतात, त्यावेळी नितीश सरकारची अस्वस्थता वाढते, असंही सिन्हा म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा