शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

Amit Shah :2024 मध्ये पीएम मोदींना प्रतिस्पर्धी नाही, जनतेला विरोधी पक्ष निवडून द्यावा लागेल: अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 12:25 IST

मोदी सरकार काळात लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे, 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात कोणीही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही प्रतिस्पर्धी नाही, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

मोदी सरकार काळात लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला आहे, 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात कोणीही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही प्रतिस्पर्धी नाही, असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. एका मुलाखतीत अमित शाह यांनी हे वक्तव्य केले आहे. लोक मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करत आहेत. 2024 च्या निवडणुकीत देशातील जनतेला भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष निवडून द्यायचा आहे, असंही गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'विरोधकांनी कदाचित निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये प्रचार केला नसेल, पण त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय निवडणुकीच्या निकालांवरून राज्यांमध्ये विरोधी पक्षाची ताकद दिसून येईल. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह यावर्षी होणाऱ्या नऊ विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची चांगली कामगिरी होईल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.

'पीएम मोदी 8 वर्षांच्या अल्प कालावधीत 51 वेळा ईशान्येकडील राज्यांमध्ये आले आहेत. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही पंतप्रधानांनी असे केलेले नाही. आज ईशान्येकडील राज्यातील जनतेला माहित आहे की नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले आहे, असंही अमित शाह म्हणाले.

Gautam Adani: अदानी समुहावरील घोटाळा आरोपावर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

"देशाची प्रगती, सुरक्षा आणि अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनवणे हे सरकारचे प्राधान्य आहे." भारताच्या कामगिरीची जगानेही दखल घेतली आहे. आठ वर्षांच्या अल्प कालावधीत देशातील 60 कोटी गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्यात आम्हाला यशही आले, असंही अमित शाह म्हणााले.

'रेल्वे आणि अंतराळ क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. आम्ही या क्षेत्रात अग्रेसर होण्याची तयारी करत आहोत. ड्रोनच्या क्षेत्रातही आपण पुढे जात आहोत. ज्या तीन राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत, ती ती राज्ये आहेत जिथे काँग्रेस पूर्वी मजबूत होती. या राज्यात मतमोजणीच्या दिवशी दुपारी 12 वाजण्यापूर्वी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी