पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण २४ परगणा येथील मथुरापूर येथे एका जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ममता यांनी बंगालला दलदलीत ढकललं असं म्हणत निशाणा साधला. तसेच गृहमंत्र्यांनी यावेळी राज्यात अनेक नवीन मोठ्या योजनांची घोषणाही केली.
जनसभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, "बंगालने खूप काही सोसलं आहेत. अनेक वर्षांपूर्वी बंगालला उद्ध्वस्त केलं होतं. एकेकाळी बंगाल हे एक समृद्ध आणि आनंदी राज्य होतं. ममता दीदींनी या राज्याला गरिबीच्या दलदलीत ढकललं. आता रवींद्रनाथ टागोर यांचं 'सोनार बांग्ला' स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे."
"TMC ला मत देऊन चूक केली तर..."
गृहमंत्री पुढे म्हणाले, "ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या 'सोनार बांग्ला'बनवू शकतात का? मी बंगालच्या जनतेला हे सांगायला आलो आहे की, जर यावेळी तुम्ही TMC ला मत देऊन चूक केली, तर इथे ममता दीदींचं नाही, तर पुतण्याचं राज्य चालेल."
"घुसखोरांना बाहेर काढलं जाईल"
अमित शाह यांनी ममतांच्या पक्षावर बंगालमध्ये घुसखोरांना आश्रय दिल्याचा आरोप केला. TMC ने बंगालला घुसखोरांसाठी सुरक्षित ठिकाण बनवलं आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरांना बाहेर काढलं जाईल आणि सीमावर्ती राज्याची सुरक्षा मजबूत केली जाईल, असंही शाह यांनी ठामपणे सांगितलं.
गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणा
गृहमंत्र्यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्यात अनेक घोषणा केल्या आहेत. भाजपा सत्तेत आल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार आणि प्रलंबित आर्थिक लाभ दिले जातील. २६ डिसेंबर २०२५ पासून सर्व रिक्त सरकारी पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. भरती परीक्षेत तरुणांना ५ वर्षांची विशेष वयोमर्यादा सवलत दिली जाईल.
भरती घोटाळ्यांना चाप लावण्यासाठी पारदर्शक यंत्रणा राबवली जाईल. भ्रष्टाचाराविरुद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण, घुसखोरीवर बंदी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत केली जाईल. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी ५,७०० कोटी रुपयांची विशेष तरतूद केली जाईल असं म्हटलं आहे.
Web Summary : Amit Shah criticized Mamata Banerjee for pushing Bengal into poverty. He promised development, state government employee pay raises, job openings, and stronger border security under BJP rule. He accused TMC of sheltering infiltrators.
Web Summary : अमित शाह ने ममता बनर्जी पर बंगाल को गरीबी में धकेलने का आरोप लगाया। उन्होंने भाजपा शासन के तहत विकास, राज्य सरकार के कर्मचारियों के वेतन में वृद्धि, नौकरी के अवसर और मजबूत सीमा सुरक्षा का वादा किया। उन्होंने टीएमसी पर घुसपैठियों को आश्रय देने का आरोप लगाया।