शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Lalu Prasad Yadav vs Amit Shah: बिहारमधील भाजपाची सत्ता गेल्याने अमित शाह सैरभैर झालेत- लालू प्रसाद यादवांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:49 IST

​​​​​​​नितीश कुमार, लालू प्रसाद यादव सोनिया गांधींची भेट घेणार

Lalu Prasad Yadav vs Amit Shah: बिहारच्या राजकारणावरून भाजप आणि आरजेडीमधील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच बिहारमधील सत्ताधारी युती आणि नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्याबद्दल हल्लाबोल केला. आता आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ते शनिवारी म्हणाले की, अमित शाह सैरभैर झाले आहेत. त्याचबरोबर, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भेटीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह लालूंनी देखील विरोधी पक्षांच्या आघाडीची गरज असल्याचाही पुनरूच्चार केला.

लालूप्रसाद यादव यांचा अमित शहांवर हल्लाबोल-

"अमित शाह पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. बिहारमध्ये त्यांचे सरकार हटवण्यात आले आहे. २०२४ मध्येही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागेल. म्हणूनच अमित शाह तिथे जाऊन जंगलराज आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत. गुजरातमध्ये तुम्ही हेच केले होते का? अमित शाह गुजरातमध्ये असताना जंगलराज होते, असा माझा आरोप आहे. बिहारमधील भाजपाचे सरकार गेल्याने अमित शाह सैरभैर झाले आहेत. २०२४ मध्ये केंद्रात आणि त्यानंतर पुढील वर्षी बिहारमध्येही भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार नाही. त्यासाठी काय करायचे ते आम्ही पाहू," असे सूचक वक्तव्य लालूंनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

सत्तेसाठी नितीश कुमार राजदची देखील साथ सोडतील असे भाजपचे नेते म्हणाले होते. त्यावर लालू प्रसाद यादव म्हणाले की ते आता एकत्र आहेत. नितीश कुमार आणि लालू यादव रविवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त असलेले लालू प्रसाद यादव म्हणाले की, आम्ही विरोधी एकजुटीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. हाच त्यांच्या बैठकीचा अजेंडा असेल, असेही त्यांनी सांगितले.

लालूंबद्दल अमित शाह म्हणाले होते...

"बिहारची भूमी नेहमीच परिवर्तन घडवून आणण्यात अग्रेसर राहिली आहे. भाजपशी गद्दारी करून नितीशजींनी स्वार्थ आणि सत्तेचे राजकारण दाखवून दिले. त्यांना सत्तेपासून दूर करण्याची सुरुवातही बिहारच्या भूमीतूनच होईल. आज मी सीमावर्ती जिल्ह्यात आलो आहे, त्यामुळे लालूजी आणि नितीशजींच्या पोटात दुखत आहे. मी बिहारमध्ये भांडणं लावण्यासाठी आलोय आणि जाताना काही तरी करूनच जाईन असा आरोप ते लोक करत आहेत. मला लालूजींना सांगावेसे वाटते की भांडणं लावण्यासाठी माझी गरज नाही. तुम्ही त्यासाठी पुरेसे आहात, कारण तुम्ही आयुष्यभर लोकांमध्ये भांडणं लावण्याचंच काम केलं आहे", अशा शब्दांत शाह यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

टॅग्स :BiharबिहारAmit Shahअमित शाहLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा