शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल...; अमित शाह यांनी अधीर रंजन यांना त्यांच्याच भाषेत समजावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 21:34 IST

काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरशी संबंधित, जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक-2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक-2023, या दोन विधेयकांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. हे विधेयक सध्या लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी अधीर रंजन चौधरी यांनाही बंगालसंदर्भात त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल, तेव्हा... -या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना अमित शहा यांनी कलम 370 चा उल्लेख केला. याच वेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या टिप्पणीलाही उत्तर दिले. उपहासात्मक अंदाजात शाह म्हणाले, काश्मीरातील कलम 370 हटल्यानंतर, काश्मीरमध्ये एम्स आदी सुविधा आल्या आहेत. तेथे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, हे तुम्हाला कळणार नाही दादा, बंगालमध्ये आमचे सरकार आल्यावर शांततेचे वातावरण काय असते, ते तुम्हाला समजेल. यानंतर संपूर्ण घरात हशा पिकला.

अरे यार अधीर रंजन... -याशिवाय, अमित शाह काश्मीरवर बोलत असताना विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी मधेच बोलू लागले. तेव्हा अमित शहा म्हणाले, अरे यार अधीर रंजन… यावर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. यानंतर, शहा म्हणाले, आपल्याला तर नियम माहित आहेत, आपण असे मधेच बोलू नये. एवढेच नाही, तर अमित शाह म्हणाले की, अधीर बाबूंही लिखित भाषण वाचायला लागले आहेत. यावर अधीर रंजन म्हणाले की, आपणही लिखित भाषणच वाचत आहात. यावर अमित शहा म्हणाले, मी माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात एकही लिखित भाषण वाचलेले नाही. मी केवळ तथ्यांसाठी कागदांचा आधार घेतो आणि यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचे भाषण सुरू केले.

पुढे बोलताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, हे विधेयक गेल्या 70 वर्षात ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना पुढे नेणारे विधेयक आहे. हे विधेयक त्यांच्याच देशात विस्थापित झालेल्यांना आदर आणि नेतृत्व देण्यासाठी आहे. या विधेयकाला कोणीही विरोध केला नाही याचा मला आनंद आहे. तब्बल सहा तास चर्चा चालली ही बाबदेखील चांगली आहे, असेही ते म्हणाले.

 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा