शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल...; अमित शाह यांनी अधीर रंजन यांना त्यांच्याच भाषेत समजावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 21:34 IST

काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरशी संबंधित, जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक-2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक-2023, या दोन विधेयकांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. हे विधेयक सध्या लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी अधीर रंजन चौधरी यांनाही बंगालसंदर्भात त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल, तेव्हा... -या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना अमित शहा यांनी कलम 370 चा उल्लेख केला. याच वेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या टिप्पणीलाही उत्तर दिले. उपहासात्मक अंदाजात शाह म्हणाले, काश्मीरातील कलम 370 हटल्यानंतर, काश्मीरमध्ये एम्स आदी सुविधा आल्या आहेत. तेथे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, हे तुम्हाला कळणार नाही दादा, बंगालमध्ये आमचे सरकार आल्यावर शांततेचे वातावरण काय असते, ते तुम्हाला समजेल. यानंतर संपूर्ण घरात हशा पिकला.

अरे यार अधीर रंजन... -याशिवाय, अमित शाह काश्मीरवर बोलत असताना विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी मधेच बोलू लागले. तेव्हा अमित शहा म्हणाले, अरे यार अधीर रंजन… यावर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. यानंतर, शहा म्हणाले, आपल्याला तर नियम माहित आहेत, आपण असे मधेच बोलू नये. एवढेच नाही, तर अमित शाह म्हणाले की, अधीर बाबूंही लिखित भाषण वाचायला लागले आहेत. यावर अधीर रंजन म्हणाले की, आपणही लिखित भाषणच वाचत आहात. यावर अमित शहा म्हणाले, मी माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात एकही लिखित भाषण वाचलेले नाही. मी केवळ तथ्यांसाठी कागदांचा आधार घेतो आणि यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचे भाषण सुरू केले.

पुढे बोलताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, हे विधेयक गेल्या 70 वर्षात ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना पुढे नेणारे विधेयक आहे. हे विधेयक त्यांच्याच देशात विस्थापित झालेल्यांना आदर आणि नेतृत्व देण्यासाठी आहे. या विधेयकाला कोणीही विरोध केला नाही याचा मला आनंद आहे. तब्बल सहा तास चर्चा चालली ही बाबदेखील चांगली आहे, असेही ते म्हणाले.

 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा