शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल...; अमित शाह यांनी अधीर रंजन यांना त्यांच्याच भाषेत समजावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 21:34 IST

काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरशी संबंधित, जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक-2023 आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक-2023, या दोन विधेयकांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आणि काँग्रेसने काश्मिरी पंडितांसाठी काहीही केले नाही, असे म्हणत, सध्याचे मोदी सरकार जे काही करत आहे, ते इतिहास नेहमी लक्षात ठेवेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. हे विधेयक सध्या लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी अधीर रंजन चौधरी यांनाही बंगालसंदर्भात त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

जेव्हा बंगालमध्ये आमचं सरकार येईल, तेव्हा... -या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना अमित शहा यांनी कलम 370 चा उल्लेख केला. याच वेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या टिप्पणीलाही उत्तर दिले. उपहासात्मक अंदाजात शाह म्हणाले, काश्मीरातील कलम 370 हटल्यानंतर, काश्मीरमध्ये एम्स आदी सुविधा आल्या आहेत. तेथे शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, हे तुम्हाला कळणार नाही दादा, बंगालमध्ये आमचे सरकार आल्यावर शांततेचे वातावरण काय असते, ते तुम्हाला समजेल. यानंतर संपूर्ण घरात हशा पिकला.

अरे यार अधीर रंजन... -याशिवाय, अमित शाह काश्मीरवर बोलत असताना विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी मधेच बोलू लागले. तेव्हा अमित शहा म्हणाले, अरे यार अधीर रंजन… यावर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. यानंतर, शहा म्हणाले, आपल्याला तर नियम माहित आहेत, आपण असे मधेच बोलू नये. एवढेच नाही, तर अमित शाह म्हणाले की, अधीर बाबूंही लिखित भाषण वाचायला लागले आहेत. यावर अधीर रंजन म्हणाले की, आपणही लिखित भाषणच वाचत आहात. यावर अमित शहा म्हणाले, मी माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात एकही लिखित भाषण वाचलेले नाही. मी केवळ तथ्यांसाठी कागदांचा आधार घेतो आणि यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचे भाषण सुरू केले.

पुढे बोलताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, हे विधेयक गेल्या 70 वर्षात ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना पुढे नेणारे विधेयक आहे. हे विधेयक त्यांच्याच देशात विस्थापित झालेल्यांना आदर आणि नेतृत्व देण्यासाठी आहे. या विधेयकाला कोणीही विरोध केला नाही याचा मला आनंद आहे. तब्बल सहा तास चर्चा चालली ही बाबदेखील चांगली आहे, असेही ते म्हणाले.

 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा