शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेसनं अडथळा आणला, पण अयोध्येत गगनाला भिडणारं राम मंदिर बांधणार - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 20:12 IST

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्याचा मुद्दा अमित शाह यांना उपस्थित केला.

लातेहार : झारखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: मैदानात उतरले असून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. झारखंडमधील लातेहारमध्ये अमित शाह यांनी अयोध्यातील राम मंदिर मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात अडथळे आणले. मात्र, अयोध्येवर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता अयोध्येत गगनाला भिडेल असे राम मंदिर बांधण्यात येईल, असे अमित शाह यांनी सांगितले. 

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्याचा मुद्दा अमित शाह यांना उपस्थित केला. ते म्हणाले, 'काँग्रेस पार्टीने वोट बँकेसाठी हा मुद्दा 70 वर्ष लटकून ठेवला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. पुन्हा पूर्ण बहुमताचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात  कलम 370 आणि 370 ए रद्द करण्याचे काम मोदींच्या सरकारने केले.'

झारखंडमधील आदिवासी मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने आदिवासींसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती अमित शाहांनी दिली. भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षात आदिवासींचा सन्मान वाढवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. सरकारने डिस्ट्रिक्ट मिनरल फंड अंतर्गत आदिवासींसाठी 32 हजार कोटी रुपये दिले. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी पंतप्रधानांनी देशभरात प्रत्येक आदिवासी ब्लॉकमध्ये एकलव्य शाळा तयार केल्या. पाच वर्षांच्या आत देशात 438 एकलव्य शाळा तयार करण्याचे काम भाजपाने केल्याचेही अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, प्रत्येकाला वाटत होते की अयोध्येत मंदिर व्हावे. मात्र, काँग्रेसने या प्रकरणाचा खटलाच चालू दिला नाही. आम्हालाही वाटत होते की संवैधानिक पद्धतीने हा वाद सुटवा आणि श्रीरामाच्या कृपेने सुप्रीम कोर्टाने आता निर्णय दिला आहे की त्याच जागेवर भव्य राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला आहे. देशातील सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते दिला आणि सांगितले की, अयोध्येतच श्रीरामाचा जन्म झाला होता आणि त्याठिकाणीच मंदिर तयार व्हावे, असे अमित शाह यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाJharkhandझारखंड