शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

'आम्ही जे बोललो, ते करुन दाखवलं', CAA लागू झाल्यानंतर अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 18:01 IST

'मी तुम्हाला वचन देतो की, CAA मुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, त्यात नागरिकत्व घेण्याची कोणतीही तरतूद नाही.'

Amit shah CAA: केंद्रातील मोदी सरकारने काल(दि.12) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी केली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांनी मंगळवारी CAA नियमांची अंमलबजावणी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, 'काँग्रेस पक्ष CAA विरोध करत होता. पण, आम्ही CAA कायदा लागू करू असे वचन दिले होते आणि आता वचन आम्ही पूर्ण केले आहे.' 

एका कार्यक्रमाला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले, 'बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून अत्याचार झालेल्या निर्वासितांना आम्ही नागरिकत्व देऊ, असे वचन आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिले होते. काँग्रेस पक्ष सातत्याने तुष्टीकरण आणि मतांच्या राजकारणामुळे CAA कायद्याला विरोध करत आला आहे. लाखो पीडित लोक आपला धर्म वाचवण्यासाठी या देशात आले. त्यांना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मान करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. मी तुम्हाला वचन देतो की, CAA मुळे कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, त्यात नागरिकत्व घेण्याची कोणतीही तरतूद नाही.' 

शाह पुढे म्हणाले, 'आम्ही दुसरे वचन दिले होते, ते म्हणजे काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे. 70 वर्षांपासून काँग्रेस वाले कलम 370 वरुन राजकारण करत होते. पण पंतप्रधान मोदींनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले आणि राज्यात शांतता प्रस्थापित केली. आम्ही तिहेरी तलाक रद्द करू, असे आश्वासन दिले होते. ते आश्वासनही आम्ही पूर्ण केले. काँग्रेसने कधीच मुस्लिम महिलांची काळजी घेतली नाही.' 

'रामलला 500 वर्षे अपमानित अवस्थेत होते, काँग्रेसने रामललाला 70 वर्षे तंबूत राहण्यास भाग पाडले.काँग्रेस पक्ष 70 वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा जैसे ते ठेवला. काँग्रेसने तर मंदिर बांधलेच नाही, उलट राम मंदिराच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली. व्होट बँकेच्या लालसेपोटी त्यांनी राम मंदिराच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारी 2024 रोजी रामललाला मान मिळवून दिला. मोदींनी देशाला राजकीय स्थैर्य देण्याचे काम केले आहे. आया राम, गया रामचे राजकारण संपवत 10 वर्षे पूर्ण बहुमताने सरकार चालवले. या 10 वर्षात मोदींनी भ्रष्टाचारमुक्त कारभार दिला आहे. मी 23 वर्षांपासून पाहतोय, मोदीजींनी एकही रजा घेतली नाही. 23 वर्षे गरिबांच्या कल्याणासाठी सतत काम करत आहे,' असंही शाह यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण