शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'आम्ही जे बोललो, ते करुन दाखवलं', CAA लागू झाल्यानंतर अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 18:01 IST

'मी तुम्हाला वचन देतो की, CAA मुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, त्यात नागरिकत्व घेण्याची कोणतीही तरतूद नाही.'

Amit shah CAA: केंद्रातील मोदी सरकारने काल(दि.12) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी केली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांनी मंगळवारी CAA नियमांची अंमलबजावणी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, 'काँग्रेस पक्ष CAA विरोध करत होता. पण, आम्ही CAA कायदा लागू करू असे वचन दिले होते आणि आता वचन आम्ही पूर्ण केले आहे.' 

एका कार्यक्रमाला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले, 'बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून अत्याचार झालेल्या निर्वासितांना आम्ही नागरिकत्व देऊ, असे वचन आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिले होते. काँग्रेस पक्ष सातत्याने तुष्टीकरण आणि मतांच्या राजकारणामुळे CAA कायद्याला विरोध करत आला आहे. लाखो पीडित लोक आपला धर्म वाचवण्यासाठी या देशात आले. त्यांना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मान करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. मी तुम्हाला वचन देतो की, CAA मुळे कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, त्यात नागरिकत्व घेण्याची कोणतीही तरतूद नाही.' 

शाह पुढे म्हणाले, 'आम्ही दुसरे वचन दिले होते, ते म्हणजे काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे. 70 वर्षांपासून काँग्रेस वाले कलम 370 वरुन राजकारण करत होते. पण पंतप्रधान मोदींनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले आणि राज्यात शांतता प्रस्थापित केली. आम्ही तिहेरी तलाक रद्द करू, असे आश्वासन दिले होते. ते आश्वासनही आम्ही पूर्ण केले. काँग्रेसने कधीच मुस्लिम महिलांची काळजी घेतली नाही.' 

'रामलला 500 वर्षे अपमानित अवस्थेत होते, काँग्रेसने रामललाला 70 वर्षे तंबूत राहण्यास भाग पाडले.काँग्रेस पक्ष 70 वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा जैसे ते ठेवला. काँग्रेसने तर मंदिर बांधलेच नाही, उलट राम मंदिराच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली. व्होट बँकेच्या लालसेपोटी त्यांनी राम मंदिराच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारी 2024 रोजी रामललाला मान मिळवून दिला. मोदींनी देशाला राजकीय स्थैर्य देण्याचे काम केले आहे. आया राम, गया रामचे राजकारण संपवत 10 वर्षे पूर्ण बहुमताने सरकार चालवले. या 10 वर्षात मोदींनी भ्रष्टाचारमुक्त कारभार दिला आहे. मी 23 वर्षांपासून पाहतोय, मोदीजींनी एकही रजा घेतली नाही. 23 वर्षे गरिबांच्या कल्याणासाठी सतत काम करत आहे,' असंही शाह यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण