शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

"राकेश टिकैत यांनी लखीमपूरमध्ये मॉब लिंचिंगचे समर्थन केले नसते तर हरयाणाच्या सीमेवर तरुणाची हत्या झाली नसती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 16:50 IST

BJP Amit Malviya And Rakesh Tikait :

नवी दिल्ली -  सिंघु बॉर्डरवर (Singhu Border) ज्याठिकाणी शेतकरी आंदोलन करत होते त्याठिकाणी एका तरुणाची निर्दयी हत्या करण्यात आली आहे. तरुणाचा हात कापून बॅरिकेड्सला लटकवला आहे. मृतदेह आढळल्यानंतर सिंघु बॉर्डरवर मोठी खळबळ माजली. याच दरम्यान भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय (BJP Amit Malviya) यांनी ट्विट करून शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि आंदोलक शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. राकेश टिकैत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "शेतकर्‍यांच्या नावाने होणाऱ्या आंदोलनांच्या मागे असलेल्या अराजकवाद्यांचा पर्दाफाश होणे गरजेचे" असल्याचं म्हटलं आहे. 

अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "राकेश टिकैत यांनी लखीमपूरमध्ये मॉब लिंचिंगचे समर्थन केले नसते, तर हरयाणाच्या सीमेवर एका तरुणाची हत्या झाली नसती. शेतकर्‍यांच्या नावाने होणाऱ्या या आंदोलनांच्या मागे असलेल्या अराजकवाद्यांचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे" असं मालवीय यांनी म्हटलं आहे. तसेच "बलात्कार, हत्या, हिंसा आणि अराजकता... हे सर्व शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली घडले आहे. आता हरयाणाच्या सीमेवर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हे काय चाललं आहे? शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली ही अराजकता पसरवणारे हे कोण आहेत, जे शेतकऱ्यांना बदनाम करत आहेत?" असं देखील म्हटलं आहे. 

सिंघु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या (Farmers Protest) मुख्य व्यासपीठावर सकाळी हा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. या व्यक्तीचं वय 35 वर्ष होतं. तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खूणा आढळल्या. ज्या तरुणाला मारलं त्याचा डावा हात कापण्यात आला होता. तरुणावर गुरु ग्रंथ साहिबची बदनामी केल्याचा संशय होता. या हत्येचा आरोप निहंगांवर लावण्यात आला आहे. निहंगांचा आरोप आहे की, तरुणाला षडयंत्र म्हणून इथं पाठवण्यात आलं होतं. त्यासाठी त्याला 30 हजार रुपये दिले होते. तरुणाने पवित्र गुरु ग्रंथ साहिबचं भंग केला.

कृषी विधेयकं मागे घ्यावीत शेतकऱ्यांची मागणी 

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या तीन कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या परंतु अद्याप कुठलाही तोडगा काढण्यात यश आलं नाही. कृषी विधेयकं मागे घ्यावीत अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे. तर विधेयक मागे घेतले जाणार नाहीत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार विधेयकात बदल करण्याची सरकारची तयारी आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपा