शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत...", मणिपूर दौऱ्यावरून अमित मालवीय यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 14:28 IST

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये राज्यांतर्गत दोन समुदायांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. अद्यापही काही ठिकाणी हिंसक संघर्ष असल्याचे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल बुधवारी अमित मालवीय यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल केल्याच्या एका दिवसानंतर अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींवर टीका करताना अमित मालवीय म्हणाले की, "राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नसून केवळ राजकीय मसिहा आहेत. ते संधीसाधू आहेत, त्यांना प्रकरण उकळत ठेवायचे आहे."

याचबरोबर, भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांना अनेक प्रश्न विचारले. काँग्रेसचे सरकार असताना राहुल गांधी यांनी मणिपूरला का भेट दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच, राहुल गांधींचा मणिपूर दौरा आपल्या स्वार्थी राजकीय अजेंडातून जन्माला आला आहे, असे अमित मालवीय म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमित मालवीय यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153ए, 120बी, 505(2), 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. 

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे आपल्या मणिपूर दौऱ्यात इंफाळ आणि चुराचंदपूर येथील समाजाच्या काही प्रतिनिधींशी संवाद साधतील. तसेच, राहुल गांधी आपल्या भेटीदरम्यान मदत शिबिरांना भेट देतील. गेल्या दोन महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. या समूहाला संघर्ष थांबवून शांततेच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी त्यांना प्रतिसादात्मक संवादाची गरज आहे. हिंसाचार ही एक मानवी शोकांतिका आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी प्रेमाचीच शक्ती वापरली जाणे आवश्यक आहे. राहुल गांधी तेच करत आहेत, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा