शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

"राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नाहीत...", मणिपूर दौऱ्यावरून अमित मालवीय यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 14:28 IST

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये राज्यांतर्गत दोन समुदायांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. अद्यापही काही ठिकाणी हिंसक संघर्ष असल्याचे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल बुधवारी अमित मालवीय यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल केल्याच्या एका दिवसानंतर अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींवर टीका करताना अमित मालवीय म्हणाले की, "राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नसून केवळ राजकीय मसिहा आहेत. ते संधीसाधू आहेत, त्यांना प्रकरण उकळत ठेवायचे आहे."

याचबरोबर, भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांना अनेक प्रश्न विचारले. काँग्रेसचे सरकार असताना राहुल गांधी यांनी मणिपूरला का भेट दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच, राहुल गांधींचा मणिपूर दौरा आपल्या स्वार्थी राजकीय अजेंडातून जन्माला आला आहे, असे अमित मालवीय म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमित मालवीय यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153ए, 120बी, 505(2), 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. 

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे आपल्या मणिपूर दौऱ्यात इंफाळ आणि चुराचंदपूर येथील समाजाच्या काही प्रतिनिधींशी संवाद साधतील. तसेच, राहुल गांधी आपल्या भेटीदरम्यान मदत शिबिरांना भेट देतील. गेल्या दोन महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. या समूहाला संघर्ष थांबवून शांततेच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी त्यांना प्रतिसादात्मक संवादाची गरज आहे. हिंसाचार ही एक मानवी शोकांतिका आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी प्रेमाचीच शक्ती वापरली जाणे आवश्यक आहे. राहुल गांधी तेच करत आहेत, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा