शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

'कब्जा केलेल्या जमिनीवर नमाज अदा केल्यावर अल्लाह स्वीकारत नाही'- स्वामी अविमुक्तेश्वरानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:26 IST

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितला धार्मिक आणि राजकीय इस्लाममधील फरक.

Avimukteshwaranand Saraswati : गेल्या काही दिवसांपासून मंदिर-मशिदीशी संबंधित वाद चर्चेत आहे. याशिवाय, मंदिर-मशीद वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे वक्तव्यही केंद्रस्थानी आले आहे. आता या सर्व वादावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, 'धार्मिक इस्लाम मानणाऱ्या लोकांनाही सत्य बाहेर यावे, असे वाटते. जे विरोध करतात, ते राजकीय इस्लामवर विश्वास ठेवतात. कब्जा केलेल्या जमिनीवर अदा केलेली नमाज, अल्लादेखील कधी स्वीकारणार नाही,' असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणतात, 'खरा इस्लाम कोणता? मंदिरे पाडून मशिदी बांधल्या, तो राजकीय इस्लाम होता, धार्मिक इस्लाम नाही. धार्मिक इस्लाम हे कधीही करू शकत नाही. एखाद्याच्या जमिनीवर ताबा मिळवून नमाज अदा केली जात असेल, तर धार्मिक इस्लामनुसार अल्लाह कधीही ती नमाज स्वीकारत नाही. राजकीय इस्लामला मानणाऱ्यांना अडचणी येऊ शकते, मात्र धार्मिक इस्लाम मानणाऱ्यांनी त्याचे स्वागत केले पाहिजे.' 

'मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्याचे ऐकल्यावर आपल्याला वेदना होतात. त्याचप्रमाणे मुस्लिम तरुणांनादेखील याचे दु:ख वाटते की, आपले पूर्वज असे अत्याचारी होते. त्यामुळेच सत्य बाहेर यावे, असे त्यालाही वाटते आणि आपल्यालाही तेच हवे असते. आम्ही काही मुस्लिमांशी बोललो, त्यांनीही सांगितले की, आम्हालाही स्पष्टता हवी आहे. धार्मिक इस्लाम मानणाऱ्या लोकांना काही अडचण नाही, पण राजकीय इस्लाम मानणाऱ्यांना सर्वाधिक त्रास होतोय,' असंही अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत स्वामी अविमुक्तेश्वरनंद सरस्वती म्हणतात की, 'संघ प्रमुख त्यांच्या सोयीने बोलतात. जेव्हा त्यांना गरज होती, तेव्हा विरोधात बोलले, आता गरज नाही तर योयीने बोलत आहेत. मोहन भागवतांनी आम्हाला नेता व्हायचे आहे, असा चुकीचा अंदाज लावला. मंदिरे पाडली आणि मशिदी बांधल्या गेल्याचे आम्हाला दुःख आहे, त्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत. मोहन भागवत आमचे चुकीचे मूल्यमापन करत आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

टॅग्स :HinduismहिंदुइझमHinduहिंदूMuslimमुस्लीमTempleमंदिरMosqueमशिद