शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Akhilesh Yadav : 'सफ़र में सांड तो मिलेंगे, जो चल सको तो चलो…', व्हिडिओ शेअर करत अखिलेश यादवांचा योगी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:56 IST

Akhilesh Yadav : अखिलेश यादव आज सीतापूर दौऱ्यावर होते. माजी मंत्री नरेंद्र वर्मा यांचे बंधू दिवंगत महेंद्र वर्मा यांना त्यांनी येथे श्रद्धांजली वाहिली.  

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भटक्या प्राण्यांच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रवासादरम्यान समोर आलेल्या बैलाचा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि लिहिले की, "प्रवासात बैल भेटतील… चालता येत असेल तर चाला… खूप अवघड आहे यूपीमध्ये प्रवास, चालता येत असेल तर चाला."

दरम्यान, अखिलेश यादव आज सीतापूर दौऱ्यावर होते. माजी मंत्री नरेंद्र वर्मा यांचे बंधू दिवंगत महेंद्र वर्मा यांना त्यांनी येथे श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला.  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव सतत भटक्या प्राण्यांचा मुद्दा उपस्थित करत होते. 

आज समाजवादी पार्टीने बैलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी शेअर करताना ट्विट केले की, “शेतकरी शेतात चारा कापायला गेला, त्याचा मृत्यू झाला. पिलीभीतच्या काकरुआ गावात बैलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू, हे अत्यंत दुःखद! शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना, सरकारने आर्थिक मदतीची भरपाई द्यावी."

विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने 403 पैकी 255 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे समाजवादी पार्टीला 111 जागांवर यश मिळाले आहे. दरम्यान, पार्टीच्या पराभवावर अखिलेश यादव यांनी आज पुन्हा सांगितले की, "विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचा नैतिक विजय झाला आहे. समाजवादी पार्टी वाढत आहे आणि समाजवादी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या संघर्षामुळे व सहकार्यामुळे भाजप कमी झाला आहे."

'लखीमपूर फाइल्स' सिनेमाही बनावा, अखिलेश यादवांचा मोदींवर निशाणाकाश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावर तयार करण्यात आलेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. यावरून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही महिन्यांपूर्वी लखीमपूर खेरी येथील घटनेचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे. लखीमपूर खेरी या घटनेवरही लखीमपूर फाईल्स नावाने चित्रपट बनवायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा