Air India Plane Crash: १२ जून २०२५ हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्याविमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातचे कारण शोधण्यासाठी विमानाच्या ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जात आहे. ही तपासणी भारतातच सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे.
सुरुवातीला असे म्हटले जात होते की, हा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवला जाईल, मात्र केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाणार नाही. विमानाचा ब्लॅक बॉक्स भारतातच आहे आणि त्याची तपासणी एएआयबीकडून केली जाईल.
ब्लॅक बॉक्स डीकोड करून माहिती मिळवली जाईलराम मोहन नायडू म्हणाले की, ब्लॅक बॉक्समधून डेटा कधी उपलब्ध होईल, ही तांत्रिक बाब आहे. तपासासाठी उच्चस्तरीय पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. सरकारने घटनेनंतर म्हटले होते की, ब्लॅक बॉक्स डीकोड केल्याने अपघातापूर्वी काय घडले याची सखोल माहिती मिळेल.
अपघातात फक्त एक प्रवासी बचावलासरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान मेडिकल हॉस्टेलच्या आवारात कोसळले. या भीषण अपघातात २४१ क्रु मेंबर्ससह २७० लोकांना आपला जीव गमवावा लागला. सुदैवाने फक्त एक प्रवासी या भीषण अपघातात बचावला. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. ब्लॅक बॉक्स हे असे उपकरण आहे, ज्याच्या मदतीने विमान अपघातापूर्वी काय घडले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विमानाबद्दल तांत्रिक माहिती गोळा करण्यास मदत करते.