शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:01 IST

Air india plane crash ATC: एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाला. हा अपघात कसा झाला, याबद्दलचे वेगवेगळे अंदाज आणि तर्क लावले जात आहेत. दरम्यान, विमान कोसळण्यापूर्वीचा पायलट सुमित सभरवाल यांचा एक मेसेज एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाला होता. तो काय होता?

Air India Plane crash pilot sumit Sabharwal News: अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान कोसळले. ते कशामुळे पडले, या प्रश्नाभोवती सध्या चर्चा सुरू आहेत. वेगवेगळी कारणे, तर्क सांगितले जात आहेत. याच अपघाताच्या घटनेत नवीन माहिती समोर आली आहे, ज्यातून अपघाताचे कारण कळण्यास मदत होऊ शकते. विमान पडण्यापूर्वी वैमानिक सुमित सभरवाल यांनी एटीसी अर्थात हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज पाठवला होता. त्यात त्यांनी विमान जमिनीच्या दिशेने जात असल्याचे कारण सांगितले होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर विमान काही क्षणात बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीच्या लोळांनी संपूर्ण परिसर कवेत घेतला. या घटनेत आतापर्यंत २७५ लोक मरण पावले आहेत. 

विमान का पडले? पायलट सुमित सभरवाल याचा मेसेज काय?

उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेंकदातच विमान पुन्हा जमिनीच्या दिशेने येऊ लागले. याच दरम्यान, सुमित सभरवाल यांनी हवाई नियंत्रण कशाला एक मेसेज पाठवला होता. ४ ते ५ सेंकदाच्या मेसेजमध्ये विमान खाली येण्याबद्दल त्यांनी माहिती दिली होती. 

पायलट सुमित सभरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला मेसेज केला की, मेडे मेडे मेडे... नो थ्रस्ट, लुजिंग पावर, अनेबल टू लिफ्ट. विमानाला समोर जाण्यासाठी पुरेशी शक्ती मिळत नाही. शक्ती कमी होत आहे. विमान वर उचलता येत नाहीये, असा मेसेज सुमित सभरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला पाठवला होता. 

नो थ्रस्ट म्हणजे काय, ज्याबद्दल सुमित सभरवालांनी माहिती दिली?

पायलट सुमित सभरवाल यांनी उल्लेख केलेला नो थ्रस्ट (No Thrust) म्हणजे इंजिन किंवा एखाद्या वाहनाच्या यंत्रणेमध्ये थ्रस्ट अर्थात पुढे ढकलण्याची शक्ती नसणे. 

एखाद्या वस्तूला (विमानाला) पुढे ढकलण्यासाठी जी प्रचंड ताकद लागते त्याला थ्रस्ट असे म्हणतात.. "नो थ्रस्ट" म्हणजे विमानाच्या इंजिनांमध्ये पुढे जाण्यासाठी कोणतीही शक्ती (थ्रस्ट) तयार होत नाहीये. इंजिन प्रचंड शक्ती निर्माण करते, जी विमानाला पुढे ढकलते, ज्यामुळे विमान हवेतून उडू शकते आणि वेगही वाढवता येतो.

वाचा >>एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय

आता जर नो थ्रस्ट परिस्थिती निर्माण झाली असेल, तर त्याची कारणे अशी असू शकतात. पहिले म्हणजे इंजिन सुरू नसतील किंवा फक्त सुरू आहेत, पण पुढे ढकलण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यात तयार होत नसेल.

दुसरं म्हणजे विमानाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती मिळत नाही. त्यामुळे विमान उडू शकत नाही किंवा हवेत वेगाने पुढे जाऊ शकत नाही. हे इंजिनातील तांत्रिक समस्येमुळे, इंधन नसलं किंवा इंजिन बंद केल्यामुळे होऊ शकतं.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमानahmedabadअहमदाबाद