शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:49 IST

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या Air India च्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्याविमानअपघाताबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळजवळ १२ वर्षे जुन्या या बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ विमानाची काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच, तीन महिन्यांपूर्वी (मार्च २०२५ मध्ये) या विमानाचे इंजिन बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

पुढील तपासणी डिसेंबरमध्ये होणार होतीमीडिया रिपोर्सनुसार, एअर इंडियाच्या या विमानाची संपूर्ण तपासणी जून २०२३ मध्ये करण्यात आली होती, तर पुढील तपासणी या वर्षीच्या डिसेंबरमध्ये करण्याचे नियोजन होते. मात्र, त्यापूर्वीच विमानाचा सर्वात भीषण अपघात झाला. तसेच, एप्रिल 2025 मध्ये एअर इंडियाने या विमानाचे विमा संरक्षण ७५० कोटी रुपयांवरून ८५० कोटी रुपये केल्याची माहितीही समोर आली आहे. 

एअर इंडियाची सेवा विस्कळीतएअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, त्या अपघातानंतर डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एअर इंडियाने सर्व विमानांची सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. कंपनीकडे असलेल्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्यावर ही तपासणी केली जाईल. तपासणीनंतरच त्यांना पुढील ऑपरेशनसाठी मान्यता दिली जाईल. एअर इंडियाने बोईंग ७८७ विमानांपैकी नऊ विमानांवर अशा तपासणी पूर्ण केली आहे, तर उर्वरित २४ विमानांसाठी डीजीसीएने दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. तसेच, या तपासणीमुळे काही उड्डाणांसाठी वेळ वाढू शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे.

एअर इंडियाने जाहीर केली नुकसान भरपाईएअर इंडियाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची अंतरिम भरपाई जाहीर केली आहे. ही भरपाई टाटा सन्सने आधीच जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या भरपाईपेक्षा वेगळी आहे.

अपघात कसा झाला?अहमदाबादमधील अपघात हा देशातील सर्वात वाईट हवाई अपघातांपैकी एक आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमान क्रमांक AI 171 मेघनी नगरमधील एका वैद्यकीय वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले, ज्यामध्ये 241 प्रवाशांसह सुमारे 270 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे एकमेव बचावले.

विमान जमिनीवर पडताच मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. अपघातानंतर विमानाच्या ढिगाऱ्यातून काढलेले मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले होते, ज्यामुळे डीएनए चाचणीनंतर त्यांची ओळख पटवली गेली. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनाही आपला जीव गमवावा लागला. अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात