शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:49 IST

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या Air India च्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्याविमानअपघाताबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळजवळ १२ वर्षे जुन्या या बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ विमानाची काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच, तीन महिन्यांपूर्वी (मार्च २०२५ मध्ये) या विमानाचे इंजिन बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

पुढील तपासणी डिसेंबरमध्ये होणार होतीमीडिया रिपोर्सनुसार, एअर इंडियाच्या या विमानाची संपूर्ण तपासणी जून २०२३ मध्ये करण्यात आली होती, तर पुढील तपासणी या वर्षीच्या डिसेंबरमध्ये करण्याचे नियोजन होते. मात्र, त्यापूर्वीच विमानाचा सर्वात भीषण अपघात झाला. तसेच, एप्रिल 2025 मध्ये एअर इंडियाने या विमानाचे विमा संरक्षण ७५० कोटी रुपयांवरून ८५० कोटी रुपये केल्याची माहितीही समोर आली आहे. 

एअर इंडियाची सेवा विस्कळीतएअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, त्या अपघातानंतर डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एअर इंडियाने सर्व विमानांची सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. कंपनीकडे असलेल्या बोईंग ७८७ विमानांच्या ताफ्यावर ही तपासणी केली जाईल. तपासणीनंतरच त्यांना पुढील ऑपरेशनसाठी मान्यता दिली जाईल. एअर इंडियाने बोईंग ७८७ विमानांपैकी नऊ विमानांवर अशा तपासणी पूर्ण केली आहे, तर उर्वरित २४ विमानांसाठी डीजीसीएने दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. तसेच, या तपासणीमुळे काही उड्डाणांसाठी वेळ वाढू शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे.

एअर इंडियाने जाहीर केली नुकसान भरपाईएअर इंडियाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची अंतरिम भरपाई जाहीर केली आहे. ही भरपाई टाटा सन्सने आधीच जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या भरपाईपेक्षा वेगळी आहे.

अपघात कसा झाला?अहमदाबादमधील अपघात हा देशातील सर्वात वाईट हवाई अपघातांपैकी एक आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमान क्रमांक AI 171 मेघनी नगरमधील एका वैद्यकीय वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले, ज्यामध्ये 241 प्रवाशांसह सुमारे 270 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे एकमेव बचावले.

विमान जमिनीवर पडताच मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. अपघातानंतर विमानाच्या ढिगाऱ्यातून काढलेले मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले होते, ज्यामुळे डीएनए चाचणीनंतर त्यांची ओळख पटवली गेली. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनाही आपला जीव गमवावा लागला. अपघाताची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात