शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:57 IST

Air India: एअर इंडियाने निवेदन जारी करुन गैरसोईबद्दल खेद व्यक्त केला.

Air India: अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया एअरलाईन चर्चेत आहे. त्या घटनेनंतर एअर इंडियाची अनेक उड्डाणे विविध कारणांमुळे रद्द झाली आहेत किंवा उड्डाणानंतर आपत्कालीन लँडिंग करावी लागली आहे. अशातच आता दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान AI2145 अर्ध्या वाटेतून परतल्याची माहिती समोर आली आहे. ज्या विमानतळावर विमान उतरणार होते, त्या विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...

एअर इंडियाने त्यांच्या निवेदनात म्हटले की, 'आज(१८ जून २०२५) रोजी बाली विमानतळाजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे दिल्लीहून बालीला जाणारे विमान AI2145 दिल्लीला परतले. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले असून, सर्व प्रवासीदेखील सुरक्षित आहेत.'

एअरलाइनने निवेदनात प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि म्हटले की, 'विमान माघारी परतल्यामुळे प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. गैरसोय कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.' याशिवाय, कंपनीने प्रवाशांना तिकीट रद्द केल्यास किंवा त्यांच्या पसंतीनुसार वेळापत्रक बदलल्यास पूर्ण परतफेडीची ऑफरदेखील दिली आहे.

एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द

खराब हवामानामुळे १४ उड्डाणे वळवण्यात आलीदरम्यान, काल(मंगळवारी) संध्याकाळी खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावर १४ उड्डाणे वळवण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भोपाळला सहा, चंदीगडला तीन, अमृतसरला दोन, अहमदाबाद, वाराणसी आणि लखनऊला प्रत्येकी एक उड्डाण पाठवण्यात आले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानdelhiदिल्लीIndonesiaइंडोनेशियाPlane Crashविमान दुर्घटनाVolcanoज्वालामुखी