शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

Air India Express Accident: ...अन् रनवेवरून एअर इंडियाचं विमान दरीत कोसळलं; जाणून घ्या शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 22:04 IST

Air India Express Accident: एअर इंडियाच्या विमानाला करीपूर विमानतळावर भीषण अपघात

कोझिकोड: केरळच्या कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला अपघात झाला आहे. दुबईवरून केरळमधल्या करीपूर विमानतळावर लँडिंग होत असताना विमान धावपट्टीवर घसरलं. या विमानात 180हून अधिक प्रवासी होते. संध्याकाळी 7:41 वाजता अपघात झाला. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीवर विमानानं ओव्हरशॉट केल्याचं दिसून आलं. (Air India Express Accident)केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दुबईहून आलेलं एअर इंडियाचं विमान लँड होत असताना धावपट्टी ओली होती. याशिवाय दृश्यमानतादेखील कमी होती, अशी माहिती नागरी उड्डाण संचलनालयानं (डीजीसीए) दिली. 'एअर इंडिया एक्स्प्रेस विमान दुबईहून कोझिकोडेला येत असताना विमानतळावर उतरल्यानंतर अपघात झाला. करीपूर विमानतळावरील रनवे क्रमांक 10 वर दुर्घटना घडली. यामध्ये विमानाचे दोन तुकडे झाले. विमानात 191 जण होते. विमान लँडिंग करताना दृश्यमानता २ हजार मीटर इतकी होती,' असं डीजीसीएकडून सांगण्यात आलं आहे. डीजीसीएकडून विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार बी७३७ विमानात १८४ प्रवासी होते. त्यामध्ये १० लहान मुलांचा समावेश होता. याशिवाय विमानात २ वैमानिकांसह एकूण ७ कर्मचारी होते. विमान धावपट्टीवरून घसरल्यानं अपघात झाला. अपघातानंतर विमानानं पेट घेतला नाही. प्रवाशांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया