शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

कोरोना कधीच नष्ट होणार नाही का?, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 15:54 IST

Corona virus: कोविड-१९ विषाणू कधीच नष्ट होणार नाही का? कोरोनापासून जगाची नेमकी केव्हा सुटका होईल? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. याच प्रश्नांवर देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी उत्तरं दिलं आहेत. 

नवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यात भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून येत्या काळात चिंता वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णसंख्या काही थांबण्याचं नाव घेत नसून राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तर अनेक राज्यांमध्ये याआधीच निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात उलथापालथ घालणारा कोविड-१९ विषाणू कधीच नष्ट होणार नाही का? कोरोनापासून जगाची नेमकी केव्हा सुटका होईल? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. याच प्रश्नांवर देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया (DR. Randeep Guleria) यांनी उत्तरं दिलं आहेत. 

मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

"कोविडचा विषाणू इतका पसरला आहे की तो बराच काळ राहील. पण एकवेळ अशी येईल की लोकांची इम्युनिटी पावर वाढेल आणि रुग्णसंख्या कमी होईल. त्यावेळी सध्या इतके रुग्ण आढळणार नाहीत. लसीकरण देखील एक सर्वसामान्य गोष्ट होऊ शकते. कदाचित कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटाला दरवर्षी कोरोनाची लस घेण्याची गरज पडू शकते. ज्यापद्धतीनं आपण एका तापाच्या साथीबाबत सहजपणे चर्चा करतो. त्याच पद्धतीनं कोरोना देखील सामान्य बाब होईल", असं महत्वपूर्ण निरीक्षण डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नोंदवलं. ते 'इंडिया टीव्ही'नं आयोजित केलेल्या 'डिजिटल आरोग्य संमेलनात' बोलत होते.

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा; देशात सर्वाधिक विक्रमी नोंद

लस हा कोविडवरचा उपाय नाही"लस हा कोविड-१९ विषाणूवरील अंतिम उपाय नाही. ते एक फक्त हत्यार आहे की ज्यामाध्यमातून आपण आपली कोरोनाविरोधात संरक्षण करू शकतो. पण लसीपेक्षा सर्वात मोठं हत्यार आपल्या हातात आहे ते म्हणजे कोविड संदर्भातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं. लस घेण्यासोबतच नियमांचं पालन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही जागरुग होऊन लस घेत आहात तर तिच जागरुकता नियमांच्याबाबतीतही दाखवायला हवी. येत्या काळात असंही होऊ शकतं की कोरोना रुप बदलेल आणि तुम्ही घेतलेले लस देखील उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे कोरोना होऊ नये यासाठी आखून देण्यात आलेले नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार आहे", असं स्पष्ट मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. 

लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असं नाही"कोरोना विरोधी लस तुम्हाला कोरोनाची लागण होण्यापासून वाचवत नाही. तर कोरोना झालाच तर मृत्यू होण्याचा धोका लस घेतल्यामुळे कमी होतो. लसीकरणामुळे आगामी काळात आपल्याला लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेण्याचीही गरज पडणार नाही. आपल्याला संक्रमणावर नियंत्रण मिळवता येईल. त्यात फक्त मायक्रो कन्टेंटमेंट झोन तयार करुन परिस्थिती हाताळता येईल. यात रेड, यलो आणि ग्रीन असे तीन झोन तयार करुन काम करता येईल", असंही गुलेरिया म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस