शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना कधीच नष्ट होणार नाही का?, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 15:54 IST

Corona virus: कोविड-१९ विषाणू कधीच नष्ट होणार नाही का? कोरोनापासून जगाची नेमकी केव्हा सुटका होईल? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. याच प्रश्नांवर देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी उत्तरं दिलं आहेत. 

नवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यात भारतातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून येत्या काळात चिंता वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णसंख्या काही थांबण्याचं नाव घेत नसून राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तर अनेक राज्यांमध्ये याआधीच निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात उलथापालथ घालणारा कोविड-१९ विषाणू कधीच नष्ट होणार नाही का? कोरोनापासून जगाची नेमकी केव्हा सुटका होईल? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. याच प्रश्नांवर देशातील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरीया (DR. Randeep Guleria) यांनी उत्तरं दिलं आहेत. 

मुंबईत उभारले जाणार चार नवे 'जम्बो कोविड सेंटर'; राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल!

"कोविडचा विषाणू इतका पसरला आहे की तो बराच काळ राहील. पण एकवेळ अशी येईल की लोकांची इम्युनिटी पावर वाढेल आणि रुग्णसंख्या कमी होईल. त्यावेळी सध्या इतके रुग्ण आढळणार नाहीत. लसीकरण देखील एक सर्वसामान्य गोष्ट होऊ शकते. कदाचित कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटाला दरवर्षी कोरोनाची लस घेण्याची गरज पडू शकते. ज्यापद्धतीनं आपण एका तापाच्या साथीबाबत सहजपणे चर्चा करतो. त्याच पद्धतीनं कोरोना देखील सामान्य बाब होईल", असं महत्वपूर्ण निरीक्षण डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नोंदवलं. ते 'इंडिया टीव्ही'नं आयोजित केलेल्या 'डिजिटल आरोग्य संमेलनात' बोलत होते.

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा; देशात सर्वाधिक विक्रमी नोंद

लस हा कोविडवरचा उपाय नाही"लस हा कोविड-१९ विषाणूवरील अंतिम उपाय नाही. ते एक फक्त हत्यार आहे की ज्यामाध्यमातून आपण आपली कोरोनाविरोधात संरक्षण करू शकतो. पण लसीपेक्षा सर्वात मोठं हत्यार आपल्या हातात आहे ते म्हणजे कोविड संदर्भातील सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं. लस घेण्यासोबतच नियमांचं पालन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही जागरुग होऊन लस घेत आहात तर तिच जागरुकता नियमांच्याबाबतीतही दाखवायला हवी. येत्या काळात असंही होऊ शकतं की कोरोना रुप बदलेल आणि तुम्ही घेतलेले लस देखील उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे कोरोना होऊ नये यासाठी आखून देण्यात आलेले नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार आहे", असं स्पष्ट मत गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. 

लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असं नाही"कोरोना विरोधी लस तुम्हाला कोरोनाची लागण होण्यापासून वाचवत नाही. तर कोरोना झालाच तर मृत्यू होण्याचा धोका लस घेतल्यामुळे कमी होतो. लसीकरणामुळे आगामी काळात आपल्याला लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घेण्याचीही गरज पडणार नाही. आपल्याला संक्रमणावर नियंत्रण मिळवता येईल. त्यात फक्त मायक्रो कन्टेंटमेंट झोन तयार करुन परिस्थिती हाताळता येईल. यात रेड, यलो आणि ग्रीन असे तीन झोन तयार करुन काम करता येईल", असंही गुलेरिया म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAIIMS hospitalएम्स रुग्णालयCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस