शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:41 IST

अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता

अहमदाबाद एअरपोर्टहून टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एअर इंडियाचं विमान खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते. त्यात २ पायलटसह १० केबिन क्रू मेंबर होते. हे विमान नेमके क्रॅश कसे झाला हा प्रश्न अनेकांना पडला आहे परंतु अद्याप अधिकृतपणे याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. परंतु एव्हिएशन एक्सपोर्ट यांनी क्रॅश होण्याचा काही अंदाज लावला आहे. त्यामुळे हे विमान क्रॅश होण्यामागे काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊया. 

एव्हिएशन एक्सपर्ट वंदना सिंह यांनी म्हटलं की, जेव्हा कधीही प्लेन टेकऑफ घेते तेव्हा ते जास्तीत जास्त इंधनासह उड्डाण घेते. अहमदाबाद विमान दुर्घटनेचं ठोस कारण आता सांगता येत नाही, त्याची माहिती फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून मिळेल. परंतु टेकऑफ घेतल्यानंतर विमान क्रॅश होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण लोड फॅक्टर असू शकते. लोड फॅक्टर मिस कॅल्क्युलेशनमुळे बऱ्याचदा प्लेन क्रॅश होण्याची शक्यता असते. लोड फॅक्टर हा कुठल्याही विमानात ठेवलेल्या वजनाचा योग्य अंदाज असतो. ज्यावर विमान संतुलित राहते. हे विमानात मागे-पुढे प्रवाशांना बसवून फिक्स केले जाते जेणेकरून प्रेशर कंट्रोल केले जाऊ शकते हे पहिले कारण त्यांनी सांगितले.

त्याशिवाय दुसरं कारण म्हणजे, विमानाचा लँडिंग गिअर पूर्णपणे बंद झाला नसावा. लँडिंग गिअर हा फ्लाईटचा असा भाग असतो, जो उड्डाण घेताना आणि उतरताना रनवेच्या संपर्कात येताच पूर्ण वजन सांभाळणे आणि काइनेटिक एनर्जी घेण्यासाठी डिझाईन केलेला असतो. हा तोच गिअर असतो ज्यातून प्लेनची चाके बाहेर येतात आणि रनवेवर प्लेन चालते असं एव्हिएशन एक्सपर्ट वंदना सिंह यांनी म्हटलं.

MAYDAY कॉल दिला अन्....

दरम्यान, अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता. मात्र त्यानंतर विमानाकडून एटीसीला कुठलाही सिग्नल मिळाला नाही. तसेच काही क्षणांतच हे विमान खाली कोसळून आगीचे लोळ आकाशाकडे झेपावताना दिसले. विमानामध्ये काही गंभीर परिस्थिती किंवा समस्या निर्माण होऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर वैमानिकांकडून हा कॉल दिला जातो.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाAccidentअपघात