अहमदाबाद एअरपोर्टहून टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एअर इंडियाचं विमान खाली कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते. त्यात २ पायलटसह १० केबिन क्रू मेंबर होते. हे विमान नेमके क्रॅश कसे झाला हा प्रश्न अनेकांना पडला आहे परंतु अद्याप अधिकृतपणे याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. परंतु एव्हिएशन एक्सपोर्ट यांनी क्रॅश होण्याचा काही अंदाज लावला आहे. त्यामुळे हे विमान क्रॅश होण्यामागे काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊया.
एव्हिएशन एक्सपर्ट वंदना सिंह यांनी म्हटलं की, जेव्हा कधीही प्लेन टेकऑफ घेते तेव्हा ते जास्तीत जास्त इंधनासह उड्डाण घेते. अहमदाबाद विमान दुर्घटनेचं ठोस कारण आता सांगता येत नाही, त्याची माहिती फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधून मिळेल. परंतु टेकऑफ घेतल्यानंतर विमान क्रॅश होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण लोड फॅक्टर असू शकते. लोड फॅक्टर मिस कॅल्क्युलेशनमुळे बऱ्याचदा प्लेन क्रॅश होण्याची शक्यता असते. लोड फॅक्टर हा कुठल्याही विमानात ठेवलेल्या वजनाचा योग्य अंदाज असतो. ज्यावर विमान संतुलित राहते. हे विमानात मागे-पुढे प्रवाशांना बसवून फिक्स केले जाते जेणेकरून प्रेशर कंट्रोल केले जाऊ शकते हे पहिले कारण त्यांनी सांगितले.
त्याशिवाय दुसरं कारण म्हणजे, विमानाचा लँडिंग गिअर पूर्णपणे बंद झाला नसावा. लँडिंग गिअर हा फ्लाईटचा असा भाग असतो, जो उड्डाण घेताना आणि उतरताना रनवेच्या संपर्कात येताच पूर्ण वजन सांभाळणे आणि काइनेटिक एनर्जी घेण्यासाठी डिझाईन केलेला असतो. हा तोच गिअर असतो ज्यातून प्लेनची चाके बाहेर येतात आणि रनवेवर प्लेन चालते असं एव्हिएशन एक्सपर्ट वंदना सिंह यांनी म्हटलं.
MAYDAY कॉल दिला अन्....
दरम्यान, अहमदाबाद विमानतळावरील रनवे २३ वरून १ वाजून ३९ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं. उड्डाण करताच विमानातील वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला Mayday कॉल दिला होता. मात्र त्यानंतर विमानाकडून एटीसीला कुठलाही सिग्नल मिळाला नाही. तसेच काही क्षणांतच हे विमान खाली कोसळून आगीचे लोळ आकाशाकडे झेपावताना दिसले. विमानामध्ये काही गंभीर परिस्थिती किंवा समस्या निर्माण होऊन प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर वैमानिकांकडून हा कॉल दिला जातो.