शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:09 IST

Air India Flight AI171 Crash: एअर इंडिया असे नादुरुस्त विमान लंडनच्या सात हजार किमीच्या अंतरासाठी कसे पाठवू शकते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

लंडनला जाणारे एअर इंडियाचेविमान दिल्लीहून अहमदाबादला आल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. या विमानात काहीतरी असामान्य वाटत होते, विमानातील सीटवरील डिस्प्ले, बटन काम करत नव्हते, एसीही काम करत नव्हते, असा दावा या व्यक्तीने केला आहे. 

आकाश वत्स नावाच्या या व्यक्तीने आपण त्या विमानातून प्रवास केल्याचे म्हटले आहे. अहमदाबाद वरून उड्डाण करण्यापूर्वी मी त्याच फ्लाइटमध्ये होतो. मी दिल्लीहून अहमदाबादला आलो होतो. मला विमानात असामान्य गोष्टी दिसल्याचे त्याने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच या पोस्टमधील व्हिडीओत विमानातील एसी काम करत नसल्याने आपण आणि इतर प्रवासी मॅकझीनने हवा घालत असल्याचे म्हटले आहे.

हे व्हिडीओ त्याने एअर इंडियाला एक्सवर पाठविण्यासाठी रेकॉर्ड केले होते. या पोस्टमधील त्याच्या दाव्याने एअर इंडियातील एसी काम करत नव्हता, डिस्प्लेचा टच काम करत नव्हता, क्रू मेंबरशी बोलण्यासाठी असलेला फोनही काम करत नसल्याचे समोर येत आहे. एअर इंडिया असे नादुरुस्त विमान लंडनच्या सात हजार किमीच्या अंतरासाठी कसे पाठवू शकते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

अहमदाबादहून दुपारी १:३८ वाजता निघालेले हे विमान बोईंग ७८७-८ विमान होते ज्यामध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अधिक माहिती देण्यासाठी एअर इंडियाने १८०० ५६९१ ४४४ हा प्रवासी हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानGujaratगुजरातAccidentअपघात