शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:23 IST

What Is MAYDAY Call Meaning: मेडे कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात...

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळ्याची मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानत क्रू मेंबरसह एकूण २४२ प्रवासी होते. विमानानं अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतल्याच्या काहीच मिनिटांत ते खाली कोसळलं. पण त्याही परिस्थितीत वैमानिकानं MAYDAY कॉल दिला होता अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमानात काहीतरी गडबड आहे याची कल्पना वैमानिकाला आली होती. हाच MAYDAY कॉल म्हणजे नेमकं काय असतं? तो का दिला जातो? त्याचा अर्थ काय असतो? याची माहिती जाणून घेऊयात...

अहमदाबाद विमान दुर्घटनेआधी वैमानिकाने अपघाताच्या काही सेकंद आधी एटीसीला (एअर ट्राफिक कंट्रोल) MAYDAY कॉल दिला होता. हवाई क्षेत्रातील प्रवासी वाहतूक परिभाषेत MAYDAY कॉल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असा संकटाचा कॉल आहे. जो आपत्कालीन परिस्थितीचा सिग्नल म्हणून दिला जातो. 

MAYDAY कॉल केव्हा दिला जातो?हा एक रेडिओद्वारे दिला जाणारा सिग्नल आहे, जो खूप गंभीर परिस्थितीत, जीवाला धोका असल्यास वापरला जातो. तो तीन वेळा दिला जातो. कारण यामुळे स्पष्ट होतं की हा विनोद किंवा चुकीचा कॉल नाही, तर खरी आपत्ती आहे. हा कॉल पुढील गंभीर परिस्थितींमध्ये दिला जातो. १. विमान किंवा जहाज अपघाताच्या उंबरठ्यावर असेल२. इंधन संपण्याची स्थिती३. इंजिन फेल होणे४. हवामान खराब होऊन विमानाचे नियंत्रण गमावणे५. आग लागणे६. प्राणघातक वैद्यकीय आपत्ती ७. दहशतवादी हल्ला किंवा विमान अपहरण

MAYDAY कॉलचा उद्देश काय?MAYDAY कॉलचा उद्देश हा जवळच्या ATC (Air Traffic Control) किंवा नौदल नियंत्रणेला लगेच सतर्क करणे असा असतो. जेणेकरुन तातडीने मदत मिळावी. जसे की रेस्क्यू टीम, अग्निशमन दल आणि इतर तांत्रिक यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचाव्यात यासाठी या कॉलची मदत होते. यासोबत त्या परिघात इतर विमानांच्या वाहतूक रोखण्यासाठीही अलर्ट या माध्यमातून मिळतो.

अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेशअहमदाबाद दुर्घटनेत वैमानिकाने दिलेला कॉलअहमदाबादच्या दुर्घटनाग्रस्त विमानात क्लाईव्ह कुंदर हे फर्स्ट ऑफीसर होते. तर सुमित सबरवाल आणि अपर्णा महाडिक हे सहकारी क्रू होते. एअर ट्राफिक कंट्रोलला MAYDAY कॉल दिला गेला होता. पण हा कॉल दिल्याच्या पुढच्याच सेकंदात विमान क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमानात काहीतरी बिघाड झाल्यानं ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाGujaratगुजरातahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात