शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'19 टन' बटाटा विकून मिळाले फक्त 490 रुपये, संतप्त शेतकऱ्याने मोदींना पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 16:00 IST

बटाट्याचे पीक घेताना मला दरवर्षी मोठे नुकसान होते. त्यामुळेच मी जुलै महिन्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पत्रद्वारे इच्छमरणाची मागणी केली होती.

लखनौ - उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील एका शेतकऱ्याला 19 हजार किलो (19 टन) बटाटा विकल्यानंतर केवळ 490 रुपये मिळाले आहेत. या घटनेमुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने मिळालेली संपूर्ण रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनी ऑर्डर केली आहे. आग्र्याच्या बरौली अहीर परिसरातील नाथू गावचे पीडित शेतकरी प्रदीप शर्मा यांच्याबाबतीत ही घटना घडल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. शेतकरी प्रदीप शर्मा यांनी पीकवीमा संदर्भात अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कांद्यानंतर आता बटाट्याच्या दरामुळेही शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचं दिसत आहे. 

बटाट्याचे पीक घेताना मला दरवर्षी मोठे नुकसान होते. त्यामुळेच मी जुलै महिन्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पत्रद्वारे इच्छमरणाची मागणी केली होती. मात्र, याबाबत मला कुठलेही उत्तर मिळाले नसल्याचे शर्मा यांनी सांगितले. शर्मा यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींना मनी ऑर्डर केल्यानंतर पोस्ट विभागातून पावतीही घेतली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दीडपट वाढ करण्याचे वचन दिले होते. मात्र, कृषी खात्यातील भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना सर्वच सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याचे शर्मा यांनी म्हटले. 

दरम्यान, यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील संजय साठे या शेतकऱ्याने कांद्याला भाव न मिळाल्याने मोदींना मनी ऑर्डर करुन पैसे पाठवले होते. साठे यांना 1.40 रुपेय प्रतिकिलो याप्रमाणे 750 किलो कांद्याचे 1064 रुपये मिळाले होते. त्यानंतर, साठे यांनी ते पैसे मोदींना मनी ऑर्डर केले होते.  

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीMONEYपैसा