शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

Agneepath Scheme: “गरज पडल्यास होऊ शकतात बदल..;” अनुराग ठाकुर म्हणाले, सरकार चर्चेसाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 23:53 IST

Agneepath Scheme: लष्कर भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Agneepath Scheme: लष्कर भरतीसंदर्भात केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण घेतले आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अनुराग ठाकुर यांनी या योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांना हिंसाचार थांबवावा आणि चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.

“सरकार खुल्या मनानं त्यांच्या तक्रारी ऐकण्यास आणि आवश्यकता भासल्यास बदल करण्यास तयार आहे. अग्निपथ योजना नरेंद्र मोदी सरकारद्वारे भविष्यात देशाला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आणि देशातील तरुणांना संधी देण्यासाठी घेण्यात आलेला एक ऐतिहासिक निर्णय आहे,” असं अनुराग ठाकुर म्हणाले. टीव्ही ९ समुहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी यावर भाष्य केलं. ज्या तरुणांना देशाच्या सैन्यदलात सहभागी व्हायचं आहे, ते कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाहीत. परंतु बदल रोखण्याच्या अजेंड्यात असलेल्या राजकीय पक्षांनी तरूणांना उकसवण्याचं काम केलं असल्याचंही ते म्हणाले.

खुल्या मनानं विचार करण्यास तयार“मी देशातील तरुणांना विनंती करू इच्छितो की हिंसाचाराचा मार्ग तुम्हाला कुठेही नेणार नाही. लोकशाहीत तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्याचा नाही. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही,” असंही अनुराग ठाकुर म्हणाले. जर तुमच्याकडे कोणत्याही चांगल्या सूचना असतील तर त्या लोकशाहीच्या मार्गानं माध्यमांसमोर ठेवू शकता किंवा आम्हाला सांगू शकता. सरकार खुल्या मनानं त्यावर विचार करण्यासाठी सदैव तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाAnurag Thakurअनुराग ठाकुरIndiaभारत