शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अग्निपथचा आगडोंब: बिहारमधील हिंसक विरोधामागे कोचिंग क्लासेसचा हात, पोलिसांच्या हाती पुरावे, व्हॉट्सॲप संदेशातून मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 07:14 IST

Agneepath Protest: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा  हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

पाटणा : बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा  हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांच्या हाती काही भक्कम पुरावे लागले आहेत. त्याआधारे कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासन दोषींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याची राजधानी पाटण्यापासून राज्याच्या जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या काही कोचिंग सेंटरच्या परिसरात विद्यार्थ्यांनी जाळपोळ केल्याचे उघड झाले आहे.

पाटण्याचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, अटकेतील काहीजणांच्या मोबाइलमध्ये काही कोचिंग सेंटरचे व्हिडिओ फुटेज व व्हॉट्सॲप संदेश मिळाले. त्यावरून जे कोचिंग सेंटर यात गुंतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. काही संचालकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यातील हिंसक घटना पाहून १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

सोशल मीडियाचा वापर कमीआंदोलनातील विद्यार्थ्यांनी त्यांचे चेहरे कपड्याने झाकलेले आहेत. आरआरबी-एनटीपीसी विरोधात झालेल्या आंदोलनात कोचिंग संचालकांची नावे पुढे आली होती. त्यानंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थी चळवळ निश्चित करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. यासाठी आता सोशल मीडियाचा कमीत कमी वापर केला जात आहे.

हिमाचल प्रदेशात आंदोलनहिमाचल प्रदेशातही अग्निपथ योजनेच्या विरोधात जागोजागी निदर्शने केली जात आहेत. कांगडा जिल्ह्यातील जसूर भागात आंदोलन करण्यात आले. मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर १० किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती. युवकांनी रेल्वे रुळांवर मोठ-मोठे दगड व लोखंडी गर्डर ठेवले होते. पोलीस पोहोचण्यापूर्वी युवक व दुकानदारांमध्ये दगडफेक झाली. आंदोलनकर्त्यांची ओळख पटवली जात असून, त्यांच्यावर एफआयआर दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

‘त्यां’ना सरकारी योजनांचा लाभ नाहीबिहारमध्ये आंदोलनकर्त्या युवकांना आगामी काळात विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. आंदोलनात त्यांच्यावर गुन्हा व आरोपपत्र दाखल झाले तर लाभासाठी ते पात्र ठरणार नाहीत. या घटनांमध्ये सामील असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी शेकडो आंदोलकांची ओळख पटविण्यात आली आहे. त्याचबरोबर निमलष्करी दलाच्या १० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात रॅपिड ॲक्शन फोर्सची १, सीआरपीएफच्या ३ व सशस्त्र सीमा दलाच्या ६ कंपन्यांचा समावेश आहे. हिंसा करणाऱ्यांवर आजवर झाली नव्हती, अशा कारवाईचा इशारा दिला आहे. 

एवढ्या तीव्र विरोधाची अपेक्षा नव्हती : नौदलप्रमुख- अग्निपथ योजनेस एवढ्या तीव्र प्रमाणात विरोध होईल, अशी मला अपेक्षा नव्हती, असे प्रतिपादन नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी केले आहे. हरीकुमार यांनी म्हटले की, अग्निपथ योजनेद्वारे भारतीय लष्करातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा मनुष्यबळ व्यवस्थापन बदल हाेत आहे. - या योजनेवर आम्ही जवळपास दीड वर्ष काम केले आहे. मी या नियोजनात सहभागी होतो. ही योजना देश आणि युवक अशा दोघांच्याही हिताची आहे. त्यातून अधिक संधी निर्माण होतील. या योजनेमुळे आता एकाऐवजी चार लोकांना संधी मिळेल.

हरयाणात खाप पंचायतींचे युवकांना समर्थनहरयाणाच्या महेंद्रगडमध्ये संतप्त युवकांनी एका वाहनाला आग लावली. अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. रेल्वे रुळांवर सामान फेकले व रुळ उखडण्याचाही प्रयत्न केला. राज्यातील खाप पंचायतीही युवकांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. दादरीमध्ये विविध खाप पंचायती व लोक संघटनांनी निदर्शने केली. पिपली, जिंद, रोहतक आणि झज्जरमध्येही आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस पक्ष तरुणांसाेबत : सोनिया गांधीकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या देशभरातील तरुणांना समर्थन देतानाच शांततेचे आवाहन केले आहे. कोविड-१९ चा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात असलेल्या सोनिया गांधी यांनी आंदोलकांना उद्देशून एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सरकारने पूर्णत: दिशाहीन असलेली योजना जाहीर केली आहे. पूर्णत: शांततेत आणि अहिंसक मार्गांनी आंदोलन करा. काॅंग्रेस तुमच्या साेबत आहे.

पंजाबमध्येही पोहोचले आंदोलनाचे लोण आंदोलकांनी लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले. रोलिंग हट्सला आगी लावल्या. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. सहा युवकांना ताब्यात घेतले आहे. धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. 

४ दिवसांत ७०० कोटींची संपत्ती खाकआंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केली. रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाBiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी