शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Agneepath: आंदोलनाची धग संपवण्यासाठी आणखी सवलती, अग्निपथ योजनेतील तरुणांना निमलष्करी दलांत १० % आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 07:58 IST

Agneepath: अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाची धग कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाची धग कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. अग्निवीरांना या निमलष्करी दलांत भरती होण्यासाठी कमाल वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णयही घोषित करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट करून याची घोषणा केली. त्यात म्हटले आहे की, सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भरतीत अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या दलांमध्ये भरतीसाठी कमाल वयाची अट अग्निवीरांसाठी तीन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी ही सवलत ५ वर्षांची असेल. सध्या निमलष्करी दलात भरती होण्यासाठी तरुणाचे वय १८ ते २३ वर्षे या दरम्यान असावे, असा नियम आहे. अग्निवीरांना २३ वर्षांच्या पुढे आणखी ३ वर्षे भरती होण्यासाठी मिळतील.

दरम्यान, अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये आंदोलकांनी जहानाबादमध्ये बस व ट्रक जाळली. तारेगना रेल्वेस्थानकावर आग लावली. पंजाबमधील लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले.

कोचिंग क्लासेसनी हिंसाचार भडकवलापाटणा : बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा हात असल्याचा संशय आहे. याबाबत पोलिसांना काही भक्कम पुरावे मिळाले आहेत. काही कोचिंग सेंटरच्या परिसरात जाळपोळ झाल्याचे उघड झाले आहे.  

योजना माजी सैनिकांशी चर्चेनंतरच : राजनाथसिंह माजी सैनिकांशी व्यापक  विचार-विमर्ष करूनच अग्निपथ योजना आणली गेली आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अग्निपथ योजनेबाबत राजकीय कारणांमुळे गैरसमज पसरविले जात आहेत. ही योजना लष्कर भरतीत क्रांतिकारक बदल आणण्यास सक्षम आहे. पंतप्रधानांना ‘माफीवीर’ बनावे लागेल; राहुल गांधी यांची टीका वादग्रस्त कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत घ्यावे लागले होते, त्याच प्रमाणे अग्निपथ योजनाही त्यांना मागे घ्यावी लागेल, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. राहुल यांनी ट्विट केले की, आठ वर्षांत भाजपा सरकारने ‘जय जवान, जय किसान’ मूल्यांचा अपमान केला. आताही पंतप्रधानांना ‘माफीवीर’ बनून ‘अग्निपथ’ योजना मागे घ्यावी लागेल. 

मालेगाव, अहमदनगरमध्ये मोर्चे मुंबई / नाशिक / बीड : अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाचे लोण अद्याप राज्यात पोहोचले नसले तरी यामुळे राज्यात रेल्वेसेवा विस्कळीत झाली. भुसावळ विभागातील ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. अग्निपथच्या विरोधात शनिवारी मालेगाव (जि. नाशिक) बीड आणि अहमदनगर येथे मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये रेल्वेला आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे भुसावळ विभागात धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या तब्बल १५ तासांहून अधिक उशिराने धावत असून, रेल्वे प्रशासनाने काही प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. भुसावळ विभागातून बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधून येणाऱ्या ११ रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाCentral Governmentकेंद्र सरकारDefenceसंरक्षण विभाग