शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: पहिल्याच सभेत फडणवीसांनी काढली मनातली भडास, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले?
2
Eknath Shinde: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले!
3
Kim Jong Un : "माझे मित्र मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री
4
सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार
5
उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
6
ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
7
"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका
8
Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
9
हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
10
Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
11
पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
12
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
13
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
14
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
15
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
16
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
17
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
18
हिवाळ्यात नारळ पाणी प्यावं की नाही? लोक हमखास करतात चूक, विसरु नका ‘ही’ योग्य वेळ
19
सोलापूर: निवडणुका बिनविरोध करण्यासाठीच 'तो' मर्डर! प्रणिती शिंदेंचा भाजपावर गंभीर आरोप
20
अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा अपघात, भरधाव दुचाकीस्वाराने दिली धडक; पत्नीही जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath: आंदोलनाची धग संपवण्यासाठी आणखी सवलती, अग्निपथ योजनेतील तरुणांना निमलष्करी दलांत १० % आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 07:58 IST

Agneepath: अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाची धग कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील अनेक राज्यांत सुरू असलेल्या तरुणांच्या हिंसक आंदोलनाची धग कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. अग्निवीरांना या निमलष्करी दलांत भरती होण्यासाठी कमाल वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णयही घोषित करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट करून याची घोषणा केली. त्यात म्हटले आहे की, सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भरतीत अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या दलांमध्ये भरतीसाठी कमाल वयाची अट अग्निवीरांसाठी तीन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी ही सवलत ५ वर्षांची असेल. सध्या निमलष्करी दलात भरती होण्यासाठी तरुणाचे वय १८ ते २३ वर्षे या दरम्यान असावे, असा नियम आहे. अग्निवीरांना २३ वर्षांच्या पुढे आणखी ३ वर्षे भरती होण्यासाठी मिळतील.

दरम्यान, अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये आंदोलकांनी जहानाबादमध्ये बस व ट्रक जाळली. तारेगना रेल्वेस्थानकावर आग लावली. पंजाबमधील लुधियाना रेल्वेस्थानक व सरकारी कार्यालयांची तोडफोड केली. पोलीस वाहनांचे मोठे नुकसान केले.

कोचिंग क्लासेसनी हिंसाचार भडकवलापाटणा : बिहारमध्ये अग्निपथ योजनेला हिंसक विरोध करण्यामागे काही कोचिंग संस्थांचा हात असल्याचा संशय आहे. याबाबत पोलिसांना काही भक्कम पुरावे मिळाले आहेत. काही कोचिंग सेंटरच्या परिसरात जाळपोळ झाल्याचे उघड झाले आहे.  

योजना माजी सैनिकांशी चर्चेनंतरच : राजनाथसिंह माजी सैनिकांशी व्यापक  विचार-विमर्ष करूनच अग्निपथ योजना आणली गेली आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अग्निपथ योजनेबाबत राजकीय कारणांमुळे गैरसमज पसरविले जात आहेत. ही योजना लष्कर भरतीत क्रांतिकारक बदल आणण्यास सक्षम आहे. पंतप्रधानांना ‘माफीवीर’ बनावे लागेल; राहुल गांधी यांची टीका वादग्रस्त कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत घ्यावे लागले होते, त्याच प्रमाणे अग्निपथ योजनाही त्यांना मागे घ्यावी लागेल, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. राहुल यांनी ट्विट केले की, आठ वर्षांत भाजपा सरकारने ‘जय जवान, जय किसान’ मूल्यांचा अपमान केला. आताही पंतप्रधानांना ‘माफीवीर’ बनून ‘अग्निपथ’ योजना मागे घ्यावी लागेल. 

मालेगाव, अहमदनगरमध्ये मोर्चे मुंबई / नाशिक / बीड : अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाचे लोण अद्याप राज्यात पोहोचले नसले तरी यामुळे राज्यात रेल्वेसेवा विस्कळीत झाली. भुसावळ विभागातील ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. अग्निपथच्या विरोधात शनिवारी मालेगाव (जि. नाशिक) बीड आणि अहमदनगर येथे मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये रेल्वेला आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे भुसावळ विभागात धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या तब्बल १५ तासांहून अधिक उशिराने धावत असून, रेल्वे प्रशासनाने काही प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. भुसावळ विभागातून बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधून येणाऱ्या ११ रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाCentral Governmentकेंद्र सरकारDefenceसंरक्षण विभाग