शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
2
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
4
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
5
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
6
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
7
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
8
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
9
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
10
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
11
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
12
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
13
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
14
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
15
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
16
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
17
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
18
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
19
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
20
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा

महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:19 IST

याच वर्षात ऑक्टोबरपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने भाजप आतापासूनच सक्रीय दिसत आहे.

भाजपने जवळजवळ तीन दशकांनंतर दिल्लीच्या सत्तेत जोरदार पुनरागमन केले आहे. मात्र, या विजयाच्या आनंदा बरोबर भाजप पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीची तयारीलाही लागला आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे सक्रिय दिसत आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बिहार, आसाम आणि तामिळनाडूसारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

याच वर्षात ऑक्टोबरपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने भाजप आतापासूनच सक्रीय दिसत आहे. बिहारमधील आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान मोदी २४ फेब्रुवारी रोजी भागलपूर येथून निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजवणार आहेत. महत्वाचे म्हणजे, भागलपूरमध्ये याची तयारीही सुरू झाली आहे.

तसेच, आसाम आणि तामिळनाडूमध्ये पुढील वर्षात निवडणुका हणार असल्या तरी, पंतप्रधान मोदी मात्र आतापासूनच तयारीत आहेत. भागलपूरमधील निवडणूक रॅलीनंतर, ते २४ फेब्रुवारीला आसाममध्येही जाणार आहेत. ते तेथे एका जनसभेला संबोधित करतील. यानंतर, ते २८ फेब्रुवारी रोजी तामिळनाडूला जात आहेत. ते तेथे रामेश्वरमला तामिळनाडूशी जोडणाऱ्या पांबन पुलाचेही उद्घाटन करतील.

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी स्वतःच निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. यामुळे, येत्या निवडणुकांतही पंतप्रधान मोदी यांच्याच नेतृत्वात होतील असे मानले जात आहे. बिहारमध्ये भाजपची नितीश कुमारांच्या जदयूसोबत युती आहे. भागलपूरमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार एकत्रितपणे व्यासपीठावर असतील. याशिवाय, भाजप गेल्या १० वर्षांपासून आसाममध्ये सत्तेवर आहे. यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दबाव त्यांच्यावर असेल. तसेच, भागलपूरच्या अनेक जागांवर भाजप कमकुवत मानला जातो. अशा स्थितीत, पंतप्रधान मोदींनी येथून रॅली करणे महत्त्वाचे मानले जाते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाBiharबिहारAssamआसामTamilnaduतामिळनाडू