शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:19 IST

याच वर्षात ऑक्टोबरपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने भाजप आतापासूनच सक्रीय दिसत आहे.

भाजपने जवळजवळ तीन दशकांनंतर दिल्लीच्या सत्तेत जोरदार पुनरागमन केले आहे. मात्र, या विजयाच्या आनंदा बरोबर भाजप पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीची तयारीलाही लागला आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे सक्रिय दिसत आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बिहार, आसाम आणि तामिळनाडूसारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

याच वर्षात ऑक्टोबरपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने भाजप आतापासूनच सक्रीय दिसत आहे. बिहारमधील आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी, पंतप्रधान मोदी २४ फेब्रुवारी रोजी भागलपूर येथून निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजवणार आहेत. महत्वाचे म्हणजे, भागलपूरमध्ये याची तयारीही सुरू झाली आहे.

तसेच, आसाम आणि तामिळनाडूमध्ये पुढील वर्षात निवडणुका हणार असल्या तरी, पंतप्रधान मोदी मात्र आतापासूनच तयारीत आहेत. भागलपूरमधील निवडणूक रॅलीनंतर, ते २४ फेब्रुवारीला आसाममध्येही जाणार आहेत. ते तेथे एका जनसभेला संबोधित करतील. यानंतर, ते २८ फेब्रुवारी रोजी तामिळनाडूला जात आहेत. ते तेथे रामेश्वरमला तामिळनाडूशी जोडणाऱ्या पांबन पुलाचेही उद्घाटन करतील.

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी स्वतःच निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. यामुळे, येत्या निवडणुकांतही पंतप्रधान मोदी यांच्याच नेतृत्वात होतील असे मानले जात आहे. बिहारमध्ये भाजपची नितीश कुमारांच्या जदयूसोबत युती आहे. भागलपूरमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार एकत्रितपणे व्यासपीठावर असतील. याशिवाय, भाजप गेल्या १० वर्षांपासून आसाममध्ये सत्तेवर आहे. यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दबाव त्यांच्यावर असेल. तसेच, भागलपूरच्या अनेक जागांवर भाजप कमकुवत मानला जातो. अशा स्थितीत, पंतप्रधान मोदींनी येथून रॅली करणे महत्त्वाचे मानले जाते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाBiharबिहारAssamआसामTamilnaduतामिळनाडू