शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची जिरली; पाक आर्मीचे मेजर असिफ गफूर म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 09:35 IST

दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत त्यामुळे युद्धाची गरज नाही.

इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्ताननेभारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा घेऊन गेले. मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकला पाठिंबा दिला नाही. त्यानंतर जगभरात भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. फेक न्यूज, बनावट व्हिडीओ शेअर करत काश्मीरवरून भारताला टार्गेट केलं. यावरूनही हातात काहीच लागत नसल्याने भारताला अण्वस्त्र युद्धाची पोकळ धमकीही देऊन झाली. मात्र आता पाकिस्तानला भारतासमोर झुकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तानची आता जिरली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेत दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत त्यामुळे युद्धाची गरज नाही. काश्मीर प्रकरणावरून भारत आणि पाक यांच्यातील तणाव वाढला असताना हा तणाव आणखी जास्त वाढू नये यासाठी आम्ही पुढे गेलो नाही असा सूर लावत नरमल्याचं चित्र पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारतासोबत युद्धाची भाषा केल्यानंतर ही पत्रकार परिषद होत आहे. मागील एक महिन्यापासून जगभरात पाकिस्तानची नामुष्की होत आहे. 

अलीकडेच पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सोशल मीडियावर पॉर्न स्टारचा व्हिडीओ पोस्ट करून ती काश्मीरमधील पीडित असल्याचा दावा केला. त्यावरून अनेकांनी त्यांची खिल्ली उडविली. त्यानंतर त्या पॉर्नस्टारनेही ट्विट करत तुमचे फॉलोअर्स वाढल्याचा चिमटा अब्दुल बसित यांना काढला. 

पाक आर्मीचे प्रवक्ते गफूर यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच भारतासोबत चर्चा करण्याचं बोलून दाखविले होते. तसेच पाकिस्तानच्या भौगोलिक स्थितीला आशियातील देश आणि जगातील शक्ती दुर्लक्ष करु शकत नाही. काश्मीर प्रकरणावरुन पाकिस्तानला जगातील कोणत्याही देशांनी साथ दिली नाही. भारत हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि जगातील अन्य भारताच्या हितामध्ये आहे असं ते म्हणाले. 

मेजर गफूर यांनी भारतासोबत चीन, अफगाणिस्तान आणि इराणवरही भाष्य केलं. चीन जगातील विकसित देश आहे. चीनसोबत भारताचे खटके उडतात तरीही दोन्ही देशांचे आर्थिक संबंध स्थिर आहेत. अफगाणिस्तानने फक्त युद्ध, कुर्बानी आणि दहशत हेच पाहिलं आहे. इराणशी संबंधावर त्यांनी सांगितले की, पाकिस्तानचे इराणसोबत चांगले संबंध आहेत मात्र पश्चिम आशियातील परिस्थिती पाहता त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानात शांतता येईल तर आमचे सैनिक पश्चिमी सीमेवरुन कमी होतील. भारतासोबत युद्धावर त्यांनी सांगितले की, भारताला वाटत असेल पाकिस्तान कमकुवत असेल तर मी फक्त एवढं सांगू इच्छितो की, युद्ध फक्त हत्यार आणि अर्थव्यवस्थेशी नाही तर देशभक्तीतूनही लढलं जाऊ शकतं. दोन दिवसांपूर्वीच इम्रान खान यांच्या बोलण्याचा नुरच पालटलेला दिसला होता. लाहोर येथील शीख बांधवांना संबोधित करताना त्यांनी जर तणाव वाढला तर जग धोक्यात येईल, यामुळे पाकिस्तान प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याचे म्हटले होतं. 

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर