शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची जिरली; पाक आर्मीचे मेजर असिफ गफूर म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 09:35 IST

दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत त्यामुळे युद्धाची गरज नाही.

इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्ताननेभारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर मुद्दा घेऊन गेले. मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकला पाठिंबा दिला नाही. त्यानंतर जगभरात भारताला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. फेक न्यूज, बनावट व्हिडीओ शेअर करत काश्मीरवरून भारताला टार्गेट केलं. यावरूनही हातात काहीच लागत नसल्याने भारताला अण्वस्त्र युद्धाची पोकळ धमकीही देऊन झाली. मात्र आता पाकिस्तानला भारतासमोर झुकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तानची आता जिरली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेत दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न देश आहेत त्यामुळे युद्धाची गरज नाही. काश्मीर प्रकरणावरून भारत आणि पाक यांच्यातील तणाव वाढला असताना हा तणाव आणखी जास्त वाढू नये यासाठी आम्ही पुढे गेलो नाही असा सूर लावत नरमल्याचं चित्र पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी भारतासोबत युद्धाची भाषा केल्यानंतर ही पत्रकार परिषद होत आहे. मागील एक महिन्यापासून जगभरात पाकिस्तानची नामुष्की होत आहे. 

अलीकडेच पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सोशल मीडियावर पॉर्न स्टारचा व्हिडीओ पोस्ट करून ती काश्मीरमधील पीडित असल्याचा दावा केला. त्यावरून अनेकांनी त्यांची खिल्ली उडविली. त्यानंतर त्या पॉर्नस्टारनेही ट्विट करत तुमचे फॉलोअर्स वाढल्याचा चिमटा अब्दुल बसित यांना काढला. 

पाक आर्मीचे प्रवक्ते गफूर यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच भारतासोबत चर्चा करण्याचं बोलून दाखविले होते. तसेच पाकिस्तानच्या भौगोलिक स्थितीला आशियातील देश आणि जगातील शक्ती दुर्लक्ष करु शकत नाही. काश्मीर प्रकरणावरुन पाकिस्तानला जगातील कोणत्याही देशांनी साथ दिली नाही. भारत हा मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि जगातील अन्य भारताच्या हितामध्ये आहे असं ते म्हणाले. 

मेजर गफूर यांनी भारतासोबत चीन, अफगाणिस्तान आणि इराणवरही भाष्य केलं. चीन जगातील विकसित देश आहे. चीनसोबत भारताचे खटके उडतात तरीही दोन्ही देशांचे आर्थिक संबंध स्थिर आहेत. अफगाणिस्तानने फक्त युद्ध, कुर्बानी आणि दहशत हेच पाहिलं आहे. इराणशी संबंधावर त्यांनी सांगितले की, पाकिस्तानचे इराणसोबत चांगले संबंध आहेत मात्र पश्चिम आशियातील परिस्थिती पाहता त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानात शांतता येईल तर आमचे सैनिक पश्चिमी सीमेवरुन कमी होतील. भारतासोबत युद्धावर त्यांनी सांगितले की, भारताला वाटत असेल पाकिस्तान कमकुवत असेल तर मी फक्त एवढं सांगू इच्छितो की, युद्ध फक्त हत्यार आणि अर्थव्यवस्थेशी नाही तर देशभक्तीतूनही लढलं जाऊ शकतं. दोन दिवसांपूर्वीच इम्रान खान यांच्या बोलण्याचा नुरच पालटलेला दिसला होता. लाहोर येथील शीख बांधवांना संबोधित करताना त्यांनी जर तणाव वाढला तर जग धोक्यात येईल, यामुळे पाकिस्तान प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याचे म्हटले होतं. 

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर