शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

दारुण पराभवानंतर सोनिया गांधी आक्रमक, पाच राज्यातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना दिले राजीनाम्याचे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:45 IST

Congress News: पाच राज्यातील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आक्रमक झाल्या असून, त्यांनी .या पराभवाची समीक्षा करत मोठा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात काँग्रेसला हातात असलेले पंजाब हे राज्य गमवावे लागले. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये सत्ता मिळवण्याची संधी गमवावी लागली. उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसला ४०३ पैकी केवळ २ जागांवर यश मिळाले. या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आक्रमक झाल्या असून, त्यांनी .या पराभवाची समीक्षा करत मोठा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान,  पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह इतर चार राज्यातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामे द्यावे लागणार आहेत.

पाच राज्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी अगदी सुमार झाली होती. पंजाबमध्ये आपच्या लाटेमध्ये काँग्रेसचा सफाया झाला. तिथे पक्षाला केवळ १८ जागा मिळाल्या. तर उत्तराखंडमध्येही काँग्रेसला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले. गोव्यात काँग्रेसला ११ तर उत्तर प्रदेशमध्ये केवळ २ आणि मणिपूरमध्ये पाच जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले.  

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२