शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

एकला चलो रे! काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 15:08 IST

सपा-बसपा आघाडीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसचा निर्णय

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं आघाडी केल्यानंतर एकट्या पडलेल्या काँग्रेसनं सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 80 मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवू आणि या निवडणुकीचा निकाल आश्चर्यचकीत करणारा असेल, असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं. काँग्रेसनं उत्तर प्रदेशात 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. मात्र काँग्रेसमधील काही नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या संपर्कात असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. (सविस्तर वृत्त लवकरच)काल समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं आघाडीची घोषणा केली. दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढवणार असल्याची माहिती मायावती आणि अखिलेश यादव या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र या दोन्ही पक्षांनी अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज काँग्रेसचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस उत्तर प्रदेशात स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. या निवडणुकीचे निकाल आश्चर्यजनक असतील, असा दावादेखील त्यांनी केला. आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये देशभरात मुख्य लढत होईल आणि त्यासाठी पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे, असं आझाद म्हणाले. आम्हाला महाआघाडी करायची होती. मात्र त्यांना आमची साथ नको होती. आता आम्ही सर्व जागा लढवण्यास तयार आहोत. आम्ही पूर्ण तयारी केली असून भाजपाला हरवण्यासाठी जो पक्ष आमच्या सोबत येईल, त्याचं आम्ही स्वागतच करू, असं म्हणत आझाद यांनी काँग्रेस इतर पक्षांसाठी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे संकेत दिले. 2009 च्या निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं उत्तर प्रदेशात 21 जागा जिंकल्या होत्या.समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीकडून काँग्रेसला महाआघाडीत स्थान देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी काल पत्रकार परिषद घेत या शक्यतांना पूर्णविराम दिला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं स्वबळावर 80 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा