शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लडाखमधील घुसखोरीनंतर आता पँगाँग सरोवराजवळ चिनी सैनिकांनी केले असे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 15:58 IST

भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्देपँगाँग सरोवर परिसरात फिंगर ४ पर्यंत घुसलेल्या चिनी सैन्याने सरोवराच्या काठावर तळ ठोकला आहेतिथे चिनी सैन्याने एक मंदारीन प्रतीक चिन्ह आणि चीनचा नकाशा तयार केला आहेचिनी सैन्याने हे कोरीवकाम फिंगर ४ आणि फिंगर ५ दरम्यान केले आहे.  याची लांबी तब्बल ८१ मीटर आणि रुंदी सुमारे २५ मीटर आहे.

लेह (लडाख) - लडाखमध्ये चिनी सैनिकांकडून सातत्याने चाललेला घुसखोरीचा प्रयत्न आणि गलवान खोऱ्यात चिनी सैनिकाशी झालेल्या झटापटीत भारताच्या २० जवानांना आलेले वीरमरण यामुळे सध्या भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमने-सामने आलेले आहे. तर एकमेकांना कुटनीतीच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी दोन्ही देशांचे सरकार प्रयत्नशील आहे. मात्र असे असले तरी नियंत्रण रेषेवर असलेल्या चिनी सैन्याकडून रोज नव्या उचापती सुरू आहेत.

पँगाँग सरोवर परिसरात फिंगर ४ पर्यंत घुसलेल्या चिनी सैन्याने सरोवराच्या काठावर तळ ठोकला असून, तिथे चिनी सैन्याने एक मंदारीन प्रतीक चिन्ह आणि चीनचा नकाशा तयार केला आहे. चिनी सैन्याने हे कोरीवकाम फिंगर ४ आणि फिंगर ५ दरम्यान केले आहे.  याची लांबी तब्बल ८१ मीटर आणि रुंदी सुमारे २५ मीटर आहे. तसेच ही चिन्हे एवढी मोठी आहेत की, ती सॅटेलाइट फोटोमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहेत. दरम्यान, तिबेटमध्ये असलेले चिनी सैन्याचे ओव्हरऑल कमांडर वँग हायजँग यांचा एक फोटो नुकताच समोर आला होता. त्या ते भारत आणि चीनच्या सीमेवर लिहिलेले चीनचे नाव रंगवताना दिसत होते.  

लडाखमधील पँगाँग सरोवरामधून भारत आणि चीनची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जाते. या सरोवराला लागून असलेल्या फिंगर १ ते ८ पर्यंत आपला हक्क आहे असा भारताचा दावा आहे. तर चीन हल्ली फिंगर आठ ते चार पर्यंत आपला दावा सांगू लागला आहे. तसेच सध्या फिंगर ४ जवळ दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आलेले आहे. येथेच मे महिन्यामध्ये चिनी सैन्य आणि भारताच्या जवानांमध्ये झटापटी झाल्या होत्या. त्यावेळी चिनी सैनिकांनी काटेरी तारा गुंडाळलेले रॉड आणि सळ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला होता.  

सध्या फिंगर ४ पर्यंत चिनी सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असून, त्यांच्याकडून भारतीय जवानांना फिंगर आठपर्यंत गस्त घालण्यापासून रोखण्यात येत आहे. तसेच या भागात चिनी सैन्याकडून मोठ्या प्रमाणावर स्थायी आणि अस्थायी बांधकाम झाल्याचे छायाचित्रांमधून दिसत आहे.  

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन