शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

पायाखालची माती घेण्यासाठी धावले अन्...; भाेलेबाबांसाठी लोकांनी एकमेकांना पायदळी तुडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 08:56 IST

नजर जाईल तिथे मृतदेहच; नातेवाइकांचा काळीज चिरणारा आक्रोश

हाथरस/एटा : सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. सत्संग झाल्यानंतर भाविकांना भाेलेबाबांची झलक पाहायची हाेती.  भाविकांना भाेलेबाबांच्या पायाखालील माती हवी हाेती. त्यासाठी भाविकांनी त्यांच्यामागे धाव घेतली. त्यावेळी चेंगराचेगरी झाली आणि १०० पेक्षा जास्त लाेकांचा मृत्यू झाला. 

चेंगराचेंगरी का झाली, याचा तपास करण्यात येत आहे. काेणतीही अफवा उडाली नव्हती. उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार यांनी चेंगराचेंगरीमागील शक्यता सांगितली. ते म्हणाले, भाविकांनी बाबांच्या पायाखालची माती घेण्यासाठी धाव घेतली. गर्दीवर नियंत्रणसाठी पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे लाेक सैरावैरा हाेऊन धावले आणि घसरून पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरक्षारक्षकांनी लाेकांना थांबवून ठेवले हाेते. 

भाेलेबाबांचा ताफा निघून गेल्यानंतर सर्वांना बाहेर जाण्यासाठी साेडले. बराच वेळ तिथे थांबल्यामुळे लाेकांचा श्वास काेंडायला लागला हाेता. लहान मुले रडायला लागली. बाहेर पडण्याची सूचना मिळताच सर्वजण दाराकडे धावले. दार लहान हाेते आणि त्यामुळे माणसांचे लाेंढेच दारावर धडकले. त्यातून धक्काबुक्की झाली आणि अनेक जण खाली पडले. कशाचाही विचार न करता लाेक खाली पडलेल्यांना पायदळी तुडवत निघत हाेते. घटनास्थळी चित्र एवढे भीषण हाेते की, नजर जाईल तिथे मृतदेहच दिसत हाेते. लाेकांच्या किंकाळ्या ऐकून आसपासचे लाेक मदतीसाठी धावले. जखमींना बस-टेम्पाेसह मिळेल त्या वाहनाने एटा येथील रुग्णालयात नेण्यात आले. अनेकजणांचा वाटेतच श्वास थांबला. दरम्यान, या प्रकरणी चाैकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

 भाविकांचा मृत्यू वेदनादायी आहे. ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमाविले त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करते. जखमींनी लवकर बरे हाेण्याची प्रार्थना करते. - द्राैपदी मुर्मू, राष्ट्रपती 

आपल्या जवळच्या लाेकांना ज्यांनी गमाविले अशा सर्व कुटुंबांबद्दल मी संवेदना व्यक्त करताे. सरकारने संवेदनशीलतेने सर्वांची मदत करायला हवी. - राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

सरकारला आयाेजनाची माहिती असूनही एवढी माेठी घटना हाेणे अतिशय दु:खद आहे. सुरक्षा आणि व्यवस्थेसाठी सरकारने काय केले, हा माेठा प्रश्न उपस्थित हाेताे. या घटनेसाठी काेणी जबाबदार असेल तर ते सरकार आहे. - अखिलेश यादव, खासदार, यूपी

यापूर्वीही घटना घडल्या, पण...याआधीही उत्तर प्रदेशात धार्मिक कार्यक्रमांदरम्यान अशा घटना घडल्या आहेत. प्रतापगड येथील कृपालू महाराज आश्रमातही अशीच घटना घडली. त्यावेळी आश्रमात आयोजित भंडारादरम्यान कपडे व खाऊचे वाटप केले जात होते, त्यासाठी त्यावेळी सुमारे आठ हजार लोक जमले होते. त्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि ३०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही अशा घटनांमधील चेंगराचेंगरी पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. दरवर्षी कुठे ना कुठे अशी घटना घडत असते.

सगळीकडे मृतदेह अन् आक्रोशयावेळी मिळेल ते वाहन वापरण्यात आले. रुग्णालयाबाहेर सगळीकडे उघड्यावर मृतदेह ठेवण्यात आले होते. परिस्थिती इतकी भीषण होती की, कोणालाच काही समजत नव्हते. कुटुंबीय आपल्या नातेवाइकांचा शोध घेत होते. ते सापडत नसल्याने त्यांनी काळीज चिरणारा आक्रोश फोडला होता. त्यांच्या रडण्याने येथील परिस्थिती भेदरून जाणारी होती.

आयाेजकांनी जबाबदारी ढकललीआयाेजन समितीचे महेश चंद्र यांनी सांगितले की, आम्ही जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतली हाेती. १२ हजारांपेक्षा जास्त सेवादार हाेते. मात्र, प्रशासनाकडून काेणतीही सुविधा नव्हती. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील नव्हती. लाेक एकमेकांवर पडले, तेव्हा त्यांना सांभाळायला काेणीच नव्हते.

मृतदेह पाहताच ढसाढसा रडले सिकंदराराउ रुग्णालयाबाहेर एक वडील आपल्या मुलीचा शोध घेत होते. तिथे आपल्या मुलीचा मृतदेह पाहिल्यावर ते ढसाढसा रडू लागले. हे काय घडले असे म्हणत ते आक्रोश करत होते.