शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 06:43 IST

भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, राहुल यांचा खोटारडेपणा उघड झाला. राहुल गांधी परकीय शक्तींच्या रिमोट कंट्रोलखाली काम करत आहेत. 

नवी दिल्ली : ‘चायना गुरू’ राहुल गांधीकाँग्रेस पक्षाला भारतीय सशस्त्र दलांचा तिटकारा आहे. राहुल गांधी विदेशी शक्तींच्या रिमोट कंट्रोलखाली काम करत आहेत असा आरोप भाजपने सोमवारी केला. तर गलवान संघर्षानंतर प्रत्येक देशभक्त भारतीयाने चीनबाबत प्रश्न विचारले. परंतु, त्याबाबत केंद्र सरकारने दिशाभूल केली,  असा आरोप काँग्रेसने केला आहे. 

भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, याआधी भारताची अर्थव्यवस्था मृत आहे, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानालाही राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता. लष्कराचा अवमान करणे हीच आता काँग्रेसची ओळख बनली आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, राहुल यांचा खोटारडेपणा उघड झाला. राहुल गांधी परकीय शक्तींच्या रिमोट कंट्रोलखाली काम करत आहेत. 

‘त्रास देण्यासाठी राहुल गांधींविरोधात केली तक्रार’न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधाने करणे योग्य नव्हते. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संसद हे व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यावर गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, राहुल गांधी आपली विधाने अधिक योग्य पद्धतीने मांडू शकले असते. मात्र याप्रकरणी केवळ त्यांना त्रास देण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काँग्रेसने विचारलेले प्रश्नगलवानमध्ये सैनिक शहीद झाल्यानंतर चार दिवसांत पंतप्रधानांनी “कोणीही आपल्या सीमेत घुसलेले नाही” असे का म्हटले. ही चीनला क्लीन चिट नव्हती ?

डेपसांग, डेमचोक आणि चुमार या भागांतील पेट्रोलिंग प्वाइंटवर जाण्यास भारतीय गस्ती पथकांना आता चीनच्या संमतीची गरज का भासत आहे?

२०२० मध्ये सुमारे १,००० चौरस किलोमीटर क्षेत्र, ज्यात डेपसांगमधील ९०० चौरस किलोमीटर भाग आहे, तो चीनच्या ताब्यात गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, ते खरे नाही का?लेहचे पोलीस अधीक्षक यांनी अहवालात ६५ पैकी २६ पेट्रोलिंग प्वाइंटवर भारताने नियंत्रण गमावल्याचे नमूद केले होते, हे सत्य नाही का?

चीनकडून होणारी आयात झपाट्याने वाढून व्यापारी तोटा विक्रमी ९९.२ अब्ज डॉलरवर पोहोचला, हे खरं नाही का?चीन पाकला ऑपरेशन सिंदूरवेळी “लाइव्ह इनपुट” देतो, अशा देशाशी सरकार संबंध “सामान्य” का करतेय?

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसchinaचीनBJPभाजपा