शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; जमीन घोटाळ्यात ईडीने बजावले होते समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:30 IST

झारखंडमध्ये ईडीची नोटीस मिळाल्यानंतर एका व्यापाऱ्याने टोकाचं पाऊल उचल्याचे समोर आलं आहे.

ED Action : गेल्या काही वर्षांपासून देशभरात अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ईडीच्या कारवाईमुळे अनेकांना तुरुंगवास देखील भोगावा लागत आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्यासाठी ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जातेय असा आरोप विरोधकांकडून होतोय. दुसरीकडे सरकार आणि ईडी कारवाईचा काहीही संबंध नसल्याचा दावा सत्ताधारी पक्ष केला जातोय. अशातच झारखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. झारखंडमध्ये ईडीची नोटीस आल्यानंतर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

झारखंडमध्ये सध्या ईडीच्या सुरु असलेल्या बेधडक कारवायांना एका व्यापाऱ्याच्या आत्महत्येसोबत जोडलं जात आहे. रांचीमध्ये एका जमीन व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर व्यापारी तणावाखाली होता असे म्हटलं जात आहे. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

रांचीच्या लालपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. कृष्णकांत नावाच्या जमीन व्यापाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.गळफास घेतल्याचे कळल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ कृष्णकांत यांना ऑर्किड रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मृत कृष्णकांत यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, रांची जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी त्यांना नोटीस पाठवली होती. ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. नोटीस मिळाल्यानंतर कृष्णकांत तणावाखाली होते. मात्र, आत्महत्येमागे ईडीची नोटीसच कारणीभूत आहे की नाही, हे समोर आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जून २०२२ मध्ये, रांचीमधील बरैतू पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. यामध्ये प्रदीप बागची नावाच्या व्यक्तीला मुख्य आरोपी करण्यात आले होते. बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतीय लष्कराची मालमत्ता हडप केल्याचा आरोप प्रदीपवर होता. ईडीने या प्रकरणाची चौकशी केली असता, ही ४.५ एकर जमीन बीएम लक्ष्मण राव यांची असल्याचे समोर आले, ज्यांनी ती स्वातंत्र्यानंतर लष्कराच्या ताब्यात दिली होती. याच जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात कृष्णप्रकाश यांना ईडीने नोटीस बजावली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंड