शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Disha Salian Case: दिशा सालियानच्या वडिलांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी केला धक्कादायक दावा, म्हणाले, ‘’माझा मुलगा…’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:40 IST

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनीही त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला आहे. तसेच दिशा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमागे काहीतरी कडी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी कोरोना विषाणू राज्यात धुमाकूळ घालत असतानाच जून २०२० मध्ये आठवडाभराच्या अंतराने झालेल्या दोन संशयास्पद आत्महत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिने आत्महत्या केल्यानंतर आठवडाभरातच १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत हाही त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत सापडला होता. दरम्यान, या दोन्ही मृत्यूंमागच्या कारणांचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यातच दिशा सालियान हिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायायालयात याचिका दाखल करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहेत. त्यापाठोपाठ आता सुशांत सिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनीही त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला आहे. तसेच दिशा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमागे काहीतरी कडी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

के. के. सिंह म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूप्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हायला पाहिजे. तेव्हा आम्ही पाटण्याला होतो. तेव्हा आम्ही जे ऐकलं होतं, त्यानुसार दिशा सालियानचा अपघात झाला होता. हा अपघात असल्याचं दर्शवण्यात आलं होतं. मात्र तिला प्रत्यक्षात इमारतीवरून खाली ढकलण्यात आलं होतं. ती सुशांतची माजी मॅनेजर होती, आम्ही हेच ऐकलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत ते पुढे म्हणाले की, सुशांत टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवणारा व्यक्ती नव्हता. त्याचा मृत्यू होण्यापूर्वी आठवडाभर आधी मी त्याच्याशी बोललो होतो. त्याच्या बोलण्यावरून तो असं काही करेल असं वाटलं नव्हतं. दरम्यान, या प्रकरणात काही सबळ निष्कर्ष हाती येत नाही तोपर्यंत न्याय झाला, असं कसं म्हणता येईल, असा सवालही त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत उपस्थित केला.

सुशांतचे वडील पुढे म्हणाले की, आता राज्यातील सरकार बदललं आहे. तसेच सध्याच्या सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आधीच्या महाविकास आघाडी सरकारमधील पोलिसांनी या प्रकरणाच योग्य पद्धतीने तपास केला नव्हता. तेव्हा ते पोलीस कुणाच्या दबावाखाली होते, हे  माहिती नाही. मात्र आता सरकार बदललं आहे. त्यामुळे सध्याचं प्रशासन आणि  मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्व विश्वास आहे. ते जे काही करतील ते योग्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेDisha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरण