कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:49 IST2025-06-09T20:31:56+5:302025-06-09T20:49:43+5:30
केरळ सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या केरळसाठी हेपेटायटीस हे आणखी एक मोठे आव्हान बनले आहे.

कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
मागील काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे आता केरळमध्ये आणखी एक नवीन संकट आले आहे, हेपेटायटीसच्या प्राणघातक प्रादुर्भावामुळे चिंता वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम त्रिशूर जिल्ह्यात दिसून येत आहे, तिथे हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने याबाबत इशारा दिला आहे, लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
त्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत लोकांना सूचना दिल्या आहेत. फक्त उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी पिण्यास सांगितले आहे. शिळे अन्न खाणे टाळा. विशेषतः हॉटेल्स आणि ढाब्यांना स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
हेपेटायटीस कसा पसरतो?
केरळमध्ये या संसर्गामागील मुख्य कारण हेपेटायटीस ए आणि ई विषाणू आहे, जो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. पावसाळा सुरू होणार आहे आणि या काळात रोग पसरण्याचा धोका आणखी वाढतो. हॉटेल्स आणि ढाब्यांना पिण्याचे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतरच द्यावे आणि गरम पाण्यात थंड पाणी मिसळू नये असे सांगण्यात आले आहे.
हेपेटायटीसची लक्षणे कोणती आहेत?
हेपेटायटीसचा संसर्ग शरीरात प्रवेश केल्यानंतर, त्याची लक्षणे दिसण्यास १५ ते ६० दिवस लागू शकतात.
मुख्य लक्षणे
ताप आणि शरीरदुखी, थकवा आणि अशक्तपणा, डोकेदुखी आणि मळमळ, डोळे आणि त्वचा पिवळी पडणे, लघवी काळी पडणे. अतिसार जर यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःहून औषधे घेणे टाळा.