शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे होणार दर्शन;जटायू मूर्ती, यज्ञ मंडप भाविकांचे लक्ष वेधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 08:50 IST

श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे.

अयाेध्या- श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी केवळ मुख्य मंदिर, इतर अनेक बांधकाम हाेत आहेत. मुख्य मंदिराशिवाय आजूबाजूचा परिसर, तीर्थक्षेत्राचा विकास इत्यादी अनेक गाेष्टी अयाेध्येत हाेत आहेत. ७० एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात संग्रहालय, सभागृह, जटायू मूर्ती, यज्ञ मंडप, औषधी वनस्पतींचे उद्यान इत्यादी अनेक गाेष्टी भाविकांचे लक्ष वेधून घेतील. मंदिराच्या ३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे दर्शन हाेणार आहे. 

श्रीराम मंदिराच्या परिसरात कायकाय आहे?

  • ७० एकर एकूण परिसर.
  • राम मंदिरात एकूण ५ शिखर आणि १४ द्वार. 
  • २.७ एकर जागेत मुख्य मंदिर बांधण्यात येत आहे.
  • ५.७४ लाख चाैरस फूट एवढे मंदिराचे एकूण बांधकामक्षेत्र आहे.
  • तीन मजले असतील. प्रत्येक तळाची उंची २० फूट राहणार आहे.
  • तळमजल्यावर १६० स्तंभ, पहिल्या माळ्यावर १३२ 
  • आणि दुसऱ्या माळ्यावर ७४ स्तंभ राहणार आहेत.
  • श्रीरामलल्लांचे पुराणकालिक दर्शनमंडळ प्रकल्पात जन्मभूमी संग्रहालय राहणार आहे. 
  • उत्खननात आढळलेले शिलालेख, पुरातन अवशेष इत्यादी वस्तू ठेवण्यात येतील.
  • गुरू वशिष्ठ पीठिकेत वेद, पुराण, रामायण आणि संस्कृत अध्ययन आणि संशाेधन क्षेत्र राहणार आहे.
  • श्रीराम मंदिरासाठी झालेल्या आंदाेलनात प्राण गमाविलेल्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारकही उभारण्यात येणार आहे.
  • २५ हजार लाेकांसाठी मंदिर परिसरात लाॅकरची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
  • मंदिर परिसराच्या दाेन बाजूंनी अग्निशमन केंद्र राहणार आहेत.
  • भाविकांना आराेग्य सेवेची गरज भासल्यास जवळच एक रुग्णालयदेखील उभारण्यात येणार आहे.

यांचीही मंदिरे बांधणारमंदिराभाेवती आयताकृती तटबंदी आहे. तटबंदीच्या चारही काेपऱ्यात श्रीगणेश, महादेव, देवी भगवती, सूर्य यांच्यासह महर्षी वाल्मीकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निशादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांची मंदिरे बांधण्यात येणार आहेत.

या दिशेने हाेणार प्रवेश, या दिशेने पडाल बाहेरमंदिरात पूर्व दिशेकडून भाविक प्रवेश करतील. दर्शन केल्यानंतर दक्षिण दिशेकडून भाविक बाहेर पडतील. मंदिर परिसरात एकूण ४४ दरवाजे आहेत.

तळमजल्याचे काम पूर्णजमिनीच्या उत्तरेकडील भागात तीन मजली मंदिर बांधण्यात येत आहे. तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

शरयू नदीत जाणार नाही मंदिरातील सांडपाणीमंदिर परिसरात दाेन स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र राहणार आहेत. मंदिरातून बाहेर निघणारे पाणी शरयू नदीत जाणार नाही. मंदिरातच त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. याशिवाय मंदिरासाठी पिण्याचे पाणी आणि वीजजाेडणीदेखील वेगळी राहणार आहे.

२२ लाख घनफूट दगडाचा वापर

मंदिराच्या निर्मितीसाठी २१ ते २२ लाख घनफूट दगडांचा वापर केला आहे. त्यात सुमारे ५ लाख घनफूट एवढा गुलाबी दगड वापरला आहे. गाभारा मकराना संगमरमरी दगडाचा बनविला आहे. कर्नाटक आणि तेलंगणा येथून १७ हजार ग्रेनाइटचे ब्लाॅक्सदेखील वापरण्यात येत आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या