शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:59 IST

अतुल सुभाष प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेविरुद्धचा वाढता रोष पाहता कायदा मंत्रालयाने एका पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

Atul Subhash Death: बंगळुरुत पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं प्रकरण चांगलेच तापलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष नावाच्या अभियंत्याने २४ पानांचे पत्र आणि सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं. या व्हिडीओमध्ये अतुलने देशातील न्यायव्यवस्था, पोलीस आणि कायद्यात पुरुषांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबतही आपले मत मांडले आहे. याशिवाय त्यांनी जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कायदा मंत्रालयाने याची दखल घेतली आहे.

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात कायदा आणि न्याय मंत्रालयाने मंगळवारी प्रतिक्रिया दिली. कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजी आणि संवेदनशीलतेने हाताळण्यास वचनबद्ध असल्याचे कायदा मंत्रालयाने म्हटलं आहे. अतुल सुभाष यांच्या आत्महत्येवरून लोकांमध्ये संताप निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे  अतुल सुभाष हे बंगळुरू येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करत होते. बंगळुरूमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून त्यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहीली होती. यामध्ये त्यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर छळ केल्याचे आणि पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचे आरोप केले होते. यामध्ये सुभाष यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले होते. न्यायाधीशांनी खटला निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप अतुलने केला. तसेच दोन वर्षांत १२० वेळा सुनावणीसाठी कोर्टात जावं लागल्याचा दावा अतुलने केला.

 न्याय व्यवस्थेवरील वाढता आक्रोश लक्षात घेता कायदा मंत्रालयाने एक्स पोस्टमध्ये आपलं म्हणणं मांडले आहे. “कौटुंबिक न्यायालये कुटुंबांमधील विवाद सोडवण्यासाठी एक समर्पित केलेलं व्यासपीठ आहे. लग्न, मुलांचा ताबा आणि वारसाशी संबंधित मुद्दे हे पारंपारिक औपचारिक न्यायालयीन शैलीशिवाय काळजी, संवेदनशीलतेने हाताळले पाहिजेत याचा इथं विचार केला जातो. त्यामुळे वेळेवर आणि उपायांवर लक्ष केंद्रित करा, तसेच कुटुंबांमधील संबंध सुधारण्यासाठी सलोख्याला प्रोत्साहन द्या," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांची नावे आहेत. अतुलचा भाऊ विकास कुमार याने बंगळुरूमधील मराठाहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आधारावर, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGovernmentसरकार