शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:59 IST

अतुल सुभाष प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेविरुद्धचा वाढता रोष पाहता कायदा मंत्रालयाने एका पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

Atul Subhash Death: बंगळुरुत पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं प्रकरण चांगलेच तापलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष नावाच्या अभियंत्याने २४ पानांचे पत्र आणि सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं. या व्हिडीओमध्ये अतुलने देशातील न्यायव्यवस्था, पोलीस आणि कायद्यात पुरुषांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबतही आपले मत मांडले आहे. याशिवाय त्यांनी जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कायदा मंत्रालयाने याची दखल घेतली आहे.

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात कायदा आणि न्याय मंत्रालयाने मंगळवारी प्रतिक्रिया दिली. कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजी आणि संवेदनशीलतेने हाताळण्यास वचनबद्ध असल्याचे कायदा मंत्रालयाने म्हटलं आहे. अतुल सुभाष यांच्या आत्महत्येवरून लोकांमध्ये संताप निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे  अतुल सुभाष हे बंगळुरू येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करत होते. बंगळुरूमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून त्यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहीली होती. यामध्ये त्यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर छळ केल्याचे आणि पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचे आरोप केले होते. यामध्ये सुभाष यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले होते. न्यायाधीशांनी खटला निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप अतुलने केला. तसेच दोन वर्षांत १२० वेळा सुनावणीसाठी कोर्टात जावं लागल्याचा दावा अतुलने केला.

 न्याय व्यवस्थेवरील वाढता आक्रोश लक्षात घेता कायदा मंत्रालयाने एक्स पोस्टमध्ये आपलं म्हणणं मांडले आहे. “कौटुंबिक न्यायालये कुटुंबांमधील विवाद सोडवण्यासाठी एक समर्पित केलेलं व्यासपीठ आहे. लग्न, मुलांचा ताबा आणि वारसाशी संबंधित मुद्दे हे पारंपारिक औपचारिक न्यायालयीन शैलीशिवाय काळजी, संवेदनशीलतेने हाताळले पाहिजेत याचा इथं विचार केला जातो. त्यामुळे वेळेवर आणि उपायांवर लक्ष केंद्रित करा, तसेच कुटुंबांमधील संबंध सुधारण्यासाठी सलोख्याला प्रोत्साहन द्या," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांची नावे आहेत. अतुलचा भाऊ विकास कुमार याने बंगळुरूमधील मराठाहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आधारावर, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGovernmentसरकार