शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:59 IST

अतुल सुभाष प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेविरुद्धचा वाढता रोष पाहता कायदा मंत्रालयाने एका पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

Atul Subhash Death: बंगळुरुत पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं प्रकरण चांगलेच तापलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष नावाच्या अभियंत्याने २४ पानांचे पत्र आणि सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं. या व्हिडीओमध्ये अतुलने देशातील न्यायव्यवस्था, पोलीस आणि कायद्यात पुरुषांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबतही आपले मत मांडले आहे. याशिवाय त्यांनी जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कायदा मंत्रालयाने याची दखल घेतली आहे.

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात कायदा आणि न्याय मंत्रालयाने मंगळवारी प्रतिक्रिया दिली. कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजी आणि संवेदनशीलतेने हाताळण्यास वचनबद्ध असल्याचे कायदा मंत्रालयाने म्हटलं आहे. अतुल सुभाष यांच्या आत्महत्येवरून लोकांमध्ये संताप निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे  अतुल सुभाष हे बंगळुरू येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करत होते. बंगळुरूमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून त्यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहीली होती. यामध्ये त्यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर छळ केल्याचे आणि पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचे आरोप केले होते. यामध्ये सुभाष यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले होते. न्यायाधीशांनी खटला निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप अतुलने केला. तसेच दोन वर्षांत १२० वेळा सुनावणीसाठी कोर्टात जावं लागल्याचा दावा अतुलने केला.

 न्याय व्यवस्थेवरील वाढता आक्रोश लक्षात घेता कायदा मंत्रालयाने एक्स पोस्टमध्ये आपलं म्हणणं मांडले आहे. “कौटुंबिक न्यायालये कुटुंबांमधील विवाद सोडवण्यासाठी एक समर्पित केलेलं व्यासपीठ आहे. लग्न, मुलांचा ताबा आणि वारसाशी संबंधित मुद्दे हे पारंपारिक औपचारिक न्यायालयीन शैलीशिवाय काळजी, संवेदनशीलतेने हाताळले पाहिजेत याचा इथं विचार केला जातो. त्यामुळे वेळेवर आणि उपायांवर लक्ष केंद्रित करा, तसेच कुटुंबांमधील संबंध सुधारण्यासाठी सलोख्याला प्रोत्साहन द्या," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांची नावे आहेत. अतुलचा भाऊ विकास कुमार याने बंगळुरूमधील मराठाहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आधारावर, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGovernmentसरकार