शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 07:35 IST

मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे.

नवी दिल्ली : मुंबईवर २६ नाव्हेंबर २००८ राेजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर काेणतीही कारवाई केली नाही. अशा हल्ल्याच्यावेळी संयम दाखवणे ही ताकद नसून दुबळेपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात काॅंग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर टीका करून पक्षाला घरचा आहेर दिला.मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे. तिवारी यांनी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची अमेरिकेतील ९/११च्या हल्ल्याशी तुलना केली. भारताने अमेरिकेप्रमाणे प्रत्युत्तर द्यायला हवे हाेते, असे तिवारी यांनी पुस्तकात लिहिले आहे. तिवारी यांनी लिहिले आहे की, शब्दांपेक्षा कृती जास्त बाेलते, अशी कधीतरी वेळ येते. २६/११च्या हल्ल्यानंतर ती वेळ हाेती ज्यावेळी कठाेर कारवाई करायला हवी हाेती. एखाद्या देशाला निर्दाेष नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्याची खंत वाटत नाही, अशा वेळी संयम हे शक्तीचे नव्हे तर दुबळेपणाचे लक्षण आहे, असे तिवारी यांनी पुस्तकात लिहिले आहे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला हाेता. अजमल कसाबसह दहा दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत शिरले हाेते. कसाबला याप्रकरणी फाशी देण्यात आली. इतर सर्व दहशतवाद्यांना हल्ल्यादरम्यान केलेल्या कारवाईत ठार केले हाेते.

सैन्यावर विश्वास नव्हता का? - भाजपचे प्रवक्ते गाैरव भाटिया यांनीही काॅंग्रेसवर टीका करताना सांगितले, की पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मनमाेहन सिंग यांच्याकडे लष्कर परवानगी मागत हाेते. मात्र, काॅंग्रेसने परवानगी दिली नाही. त्यामागे काय कारण हाेते? आपल्या सैन्यावर तुमचा विश्वास नव्हता का, असा सवाल भाजपने केला आहे.

काँग्रेसची सावध प्रतिक्रिया - तिवारी यांच्या पुस्तकावर काॅंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की पुस्तक आधी येऊ द्या. चर्चा करायची की नाही, याबाबत पुस्तक वाचल्यानंतर ठरवू. त्या पुस्तकापेक्षा आज सर्वसामान्य लाेकांसमाेर महागाईचा गंभीर प्रश्न आहे. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपा