शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 07:35 IST

मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे.

नवी दिल्ली : मुंबईवर २६ नाव्हेंबर २००८ राेजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर काेणतीही कारवाई केली नाही. अशा हल्ल्याच्यावेळी संयम दाखवणे ही ताकद नसून दुबळेपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात काॅंग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर टीका करून पक्षाला घरचा आहेर दिला.मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे. तिवारी यांनी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची अमेरिकेतील ९/११च्या हल्ल्याशी तुलना केली. भारताने अमेरिकेप्रमाणे प्रत्युत्तर द्यायला हवे हाेते, असे तिवारी यांनी पुस्तकात लिहिले आहे. तिवारी यांनी लिहिले आहे की, शब्दांपेक्षा कृती जास्त बाेलते, अशी कधीतरी वेळ येते. २६/११च्या हल्ल्यानंतर ती वेळ हाेती ज्यावेळी कठाेर कारवाई करायला हवी हाेती. एखाद्या देशाला निर्दाेष नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्याची खंत वाटत नाही, अशा वेळी संयम हे शक्तीचे नव्हे तर दुबळेपणाचे लक्षण आहे, असे तिवारी यांनी पुस्तकात लिहिले आहे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला हाेता. अजमल कसाबसह दहा दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत शिरले हाेते. कसाबला याप्रकरणी फाशी देण्यात आली. इतर सर्व दहशतवाद्यांना हल्ल्यादरम्यान केलेल्या कारवाईत ठार केले हाेते.

सैन्यावर विश्वास नव्हता का? - भाजपचे प्रवक्ते गाैरव भाटिया यांनीही काॅंग्रेसवर टीका करताना सांगितले, की पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मनमाेहन सिंग यांच्याकडे लष्कर परवानगी मागत हाेते. मात्र, काॅंग्रेसने परवानगी दिली नाही. त्यामागे काय कारण हाेते? आपल्या सैन्यावर तुमचा विश्वास नव्हता का, असा सवाल भाजपने केला आहे.

काँग्रेसची सावध प्रतिक्रिया - तिवारी यांच्या पुस्तकावर काॅंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की पुस्तक आधी येऊ द्या. चर्चा करायची की नाही, याबाबत पुस्तक वाचल्यानंतर ठरवू. त्या पुस्तकापेक्षा आज सर्वसामान्य लाेकांसमाेर महागाईचा गंभीर प्रश्न आहे. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपा