शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

Afghanistan Crisis: भारत सरकार तालिबानसोबत चर्चा करणार? २० वर्षांनंतर संपर्क साधणार, सूत्रांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 14:02 IST

Afghanistan Crisis & India: , अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली - अफगाणिस्तानवर तालिबाबने कब्जा केल्यानंतर आता तिथे स्थापन होणारे नवे सरकार आणि त्याच्या धोरणांबाबत चर्चा सुरूझाली आहे. दरम्यान, तालिबान सरकारसोबत भारत सरकार चर्चा करणार का? २० वर्षांनंतर तालिबानसोबतभारत सरकार संपर्क साधणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (Sources said, Will Indian government hold talks with Taliban? Contact after 20 years )

या संदर्भातील वृत् न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सध्यातरी संपूर्ण जगात अफगाणिस्तानच्या नव्या सरकारला मान्यता देण्याबाबत कुठल्याही देशाने औपचारिक निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनी न्यूज १८ ला सांगितले की, गजर पडल्यावर तालिबानशी संपर्क साधला जाईल. तसेच चर्चा केली जाईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमध्ये बदललेली परिस्थिती आणि तालिबानने सत्तेवर केलेला कब्जा विचारात घेऊन भारत सरकार लवकरच या प्रकरणी एक धोरण ठरवणार आहे. त्यानंतर तालिबानसोबत चर्चा केली जाईल. मात्र यापूर्वीही सरकारने तालिबानसोबत संपर्कात असल्याच्या वृत्तांना नकार दिला  नव्हता.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये भारताने मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार असावे, यामध्ये सर्व वर्गांचे प्रतिनिधी असावेत, अशी भारताची अपेक्षा आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी मानवाधिकार परिषदेमध्ये सांगितले की, एक व्यापक प्रतिनिधित्व असलेल्या सरकारला अधिक स्वीकारार्हता आणि वैधता मिळवण्यात मदत होईल. अफगाणी महिलांचा आवाज, अफगाणी मुलांच्या अपेक्षा आणि अल्पसंख्याक समुदायाच्या अधिकारांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच अफगाणिस्तानमधील स्थिरतेचा संबंध हा या प्रदेशातील शांती आमि सुरक्षेशी निगडित आहे. लष्कर आणि जैशसारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत येता कामा नये.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात ४५ मिनिटे चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला होता. रशियासारखा देशही अमेरिकन सैन्याची माघार आणि अफगाणिस्तानमधील बदल्या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण राहील असे मानतो, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान