शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

Afghanistan Crisis: भारत सरकार तालिबानसोबत चर्चा करणार? २० वर्षांनंतर संपर्क साधणार, सूत्रांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 14:02 IST

Afghanistan Crisis & India: , अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवी दिल्ली - अफगाणिस्तानवर तालिबाबने कब्जा केल्यानंतर आता तिथे स्थापन होणारे नवे सरकार आणि त्याच्या धोरणांबाबत चर्चा सुरूझाली आहे. दरम्यान, तालिबान सरकारसोबत भारत सरकार चर्चा करणार का? २० वर्षांनंतर तालिबानसोबतभारत सरकार संपर्क साधणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (Sources said, Will Indian government hold talks with Taliban? Contact after 20 years )

या संदर्भातील वृत् न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सध्यातरी संपूर्ण जगात अफगाणिस्तानच्या नव्या सरकारला मान्यता देण्याबाबत कुठल्याही देशाने औपचारिक निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनी न्यूज १८ ला सांगितले की, गजर पडल्यावर तालिबानशी संपर्क साधला जाईल. तसेच चर्चा केली जाईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमध्ये बदललेली परिस्थिती आणि तालिबानने सत्तेवर केलेला कब्जा विचारात घेऊन भारत सरकार लवकरच या प्रकरणी एक धोरण ठरवणार आहे. त्यानंतर तालिबानसोबत चर्चा केली जाईल. मात्र यापूर्वीही सरकारने तालिबानसोबत संपर्कात असल्याच्या वृत्तांना नकार दिला  नव्हता.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये भारताने मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार असावे, यामध्ये सर्व वर्गांचे प्रतिनिधी असावेत, अशी भारताची अपेक्षा आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी मानवाधिकार परिषदेमध्ये सांगितले की, एक व्यापक प्रतिनिधित्व असलेल्या सरकारला अधिक स्वीकारार्हता आणि वैधता मिळवण्यात मदत होईल. अफगाणी महिलांचा आवाज, अफगाणी मुलांच्या अपेक्षा आणि अल्पसंख्याक समुदायाच्या अधिकारांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच अफगाणिस्तानमधील स्थिरतेचा संबंध हा या प्रदेशातील शांती आमि सुरक्षेशी निगडित आहे. लष्कर आणि जैशसारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत येता कामा नये.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात ४५ मिनिटे चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला होता. रशियासारखा देशही अमेरिकन सैन्याची माघार आणि अफगाणिस्तानमधील बदल्या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण राहील असे मानतो, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान