शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: ...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:58 IST

Afghanistan Crisis Update:

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर भारतासह अनेक देशांनी तेथून आपल्या नागरिकांना काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना भरात सरकारने अफगाणिस्तानमधूनभारतात सुरक्षित आणले आहे. (Afghanistan Crisis )मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये काही नागरिक आहेत, जे भारतात परत येऊ इच्छित नाहीत. या लोकांची संख्या ७० ते ८० च्या दरम्यान आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले हे हिंदू आणि शीख अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ते भारताकडून पाठवण्यात आलेली विमाने सोडत आहेत. या परिस्थितीमुळे भारत सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांमध्ये भारतातून अफगाणिस्तानमध्ये पाठवली गेलेली विमाने रिकामी परत आली आहेत. (so Hindus and Sikhs in Afghanistan prefer to go to these countries instead of India)

इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंधोक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील गुरुद्वारा कर्ते परवानमध्ये उपस्थित असलेले ७० ते ८० अफगाण शीख आणि हिंदू भारतात परत येऊ इच्छित नाही. त्यांचा कॅनडा किंवा अमेरिकेत जाण्याची इच्छा आहे. हे लोक केवळ फ्लाईट सोडत नाही आहेत. तर इतर लोकांच्या येण्याच्या मार्गातही अडथळे आणत आहेत.

पुनीत सिंग यांनी सांगितले की, या लोकांना अमेरिका आणि कॅनडामध्ये जाण्याच्या नादात दोन वेळा विमान सोडले आहे. भारत सरकार उच्चस्तरीय सुविधा उपलब्ध करून देत असतानाही हे लोक भारतात येण्यास नकार देत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीख संघटनांनी सर्व अफगाण शीख आणि हिंदूंना बाहेर पडण्यासाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली आहे. यामधून १०० जण काबुल विमानतळाबाहेर आले होते. मात्र त्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही.

दरम्यान, गुरुद्वारामध्ये असलेल्या शीखांचे नेते तरविंदर सिंग यांनी एक व्हिडीओ संदेश पाठवला आहे. त्यात ते म्हणतात की, त्यांना भारतात यायचे नाही. तर अमेरिका किंवा कॅनडामध्ये जायचे आहे. अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्यात चुकीचे काय आहे, असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे. जे लोक भारतात गेले आहेत. त्यांची काय अवस्था झालीय हे आम्हाला माहिती आहे. ते परत अफगाणिस्तामध्ये आले किंवा परत इतर देशांमध्ये गेले.

तालिबानने गेल्या रविवारी काबुलवर कब्जा केलाहोता. त्यानंतर भारत सरकारने अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमधून राजदूत आणि दुतावासामधील अन्य कर्मचाऱ्यांसह सुमारे २०० जणांना हवाई दलाच्या सी-१९ विमानातून भारतात परत आणले होते. त्यानंतर अफगाणिस्तानमधून सामान्य नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारतHinduहिंदू