शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

Afghanistan Crisis: ...म्हणून भारताऐवजी या देशांत जाण्यास प्राधान्य देताहेत अफगाणिस्तानमधील हिंदू आणि शीख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:58 IST

Afghanistan Crisis Update:

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर भारतासह अनेक देशांनी तेथून आपल्या नागरिकांना काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना भरात सरकारने अफगाणिस्तानमधूनभारतात सुरक्षित आणले आहे. (Afghanistan Crisis )मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये काही नागरिक आहेत, जे भारतात परत येऊ इच्छित नाहीत. या लोकांची संख्या ७० ते ८० च्या दरम्यान आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेले हे हिंदू आणि शीख अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ते भारताकडून पाठवण्यात आलेली विमाने सोडत आहेत. या परिस्थितीमुळे भारत सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांमध्ये भारतातून अफगाणिस्तानमध्ये पाठवली गेलेली विमाने रिकामी परत आली आहेत. (so Hindus and Sikhs in Afghanistan prefer to go to these countries instead of India)

इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंधोक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील गुरुद्वारा कर्ते परवानमध्ये उपस्थित असलेले ७० ते ८० अफगाण शीख आणि हिंदू भारतात परत येऊ इच्छित नाही. त्यांचा कॅनडा किंवा अमेरिकेत जाण्याची इच्छा आहे. हे लोक केवळ फ्लाईट सोडत नाही आहेत. तर इतर लोकांच्या येण्याच्या मार्गातही अडथळे आणत आहेत.

पुनीत सिंग यांनी सांगितले की, या लोकांना अमेरिका आणि कॅनडामध्ये जाण्याच्या नादात दोन वेळा विमान सोडले आहे. भारत सरकार उच्चस्तरीय सुविधा उपलब्ध करून देत असतानाही हे लोक भारतात येण्यास नकार देत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शीख संघटनांनी सर्व अफगाण शीख आणि हिंदूंना बाहेर पडण्यासाठी चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली आहे. यामधून १०० जण काबुल विमानतळाबाहेर आले होते. मात्र त्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही.

दरम्यान, गुरुद्वारामध्ये असलेल्या शीखांचे नेते तरविंदर सिंग यांनी एक व्हिडीओ संदेश पाठवला आहे. त्यात ते म्हणतात की, त्यांना भारतात यायचे नाही. तर अमेरिका किंवा कॅनडामध्ये जायचे आहे. अमेरिका किंवा कॅनडामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्यात चुकीचे काय आहे, असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे. जे लोक भारतात गेले आहेत. त्यांची काय अवस्था झालीय हे आम्हाला माहिती आहे. ते परत अफगाणिस्तामध्ये आले किंवा परत इतर देशांमध्ये गेले.

तालिबानने गेल्या रविवारी काबुलवर कब्जा केलाहोता. त्यानंतर भारत सरकारने अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमधून राजदूत आणि दुतावासामधील अन्य कर्मचाऱ्यांसह सुमारे २०० जणांना हवाई दलाच्या सी-१९ विमानातून भारतात परत आणले होते. त्यानंतर अफगाणिस्तानमधून सामान्य नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारतHinduहिंदू